Posts

Showing posts from March, 2024

13. साक्षीदार असणे

Image
  संपूर्ण गीतेचे वर्णन करू शकेल असा एक शब्द जर कुठला असेल तर तो आहे द्रष्टा म्हणजे साक्षीदार आणि हा शब्द अनेक संदर्भात येतो. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे कारण आपल्यापैकी बहुतेकांना असे वाटते की ‘ आपण ’ सर्वकाही करतो आणि परिस्थिती नियंत्रित करतो. कुरुक्षेत्र युद्धाच्या प्रसंगी अर्जुन सुमारे 60 वर्षांचा होता, त्याने उत्तम आयुष्य जगले होते आणि सर्व सुखांचा अनुभवही घेऊन झाला होता. योद्धा म्हणून त्याने कित्येक युद्धांमध्ये विजय मिळविला होता. युद्धाच्या प्रसंगी त्याला असे वाटत होते की तो कर्ता आहे (अहम-कर्ता; अहंकार) आणि आपल्या नातलगांच्या मृत्युसाठी तो जबाबदार राहील. त्यामुळे, ऐन युद्धाच्या वेळी त्याच्या मनात नैराश्य दाटून आले होते. संपूर्ण गीते दरम्यान भगवान श्रीकृष्ण त्याला हेच सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत की तो कर्ता नाही. त्यातून स्वाभाविकपणे एक प्रश्न निर्माण होतो आणि तो म्हणजे: “जर मी कर्ता नाही, तर मी काय आहे”. गीतेमध्ये भगवंत सांगतात की अर्जुन हा केवळ एक द्रष्टा आहे, साक्षीदार आहे. साठ वर्षांच्या आयुष्यात बरे-वाईट अनुभव घेतलेल्या अर्जुनाला हे पचवणे अत्यंत जड जाते की तो के...

12. मनावर नियंत्रण

Image
  अर्जुन मनाची तुलना वायूशी करतो आणि त्यावर नियंत्रण कसे आणावे हे त्याला जाणून घ्यायचे आहे, जेणेकरून संतुलन साधले जावे. श्रीकृष्ण म्हणतात की हे निश्चितच अवघड आहे पण वैराग्य सरावाने ते साध्य करता येते. इंद्रियांद्वारे गोळा केलेली माहिती सुरक्षित किंवा असुरक्षित असी विभाजित करण्यासाठी मेंदू विकसित झाला आहे. हे करण्यासाठी मेंदू स्मरणशक्ती वापरतो. या क्षमतेने उत्क्रांतीच्या काळात आम्हाला जगण्यास आणि समृद्ध होण्यास मदत केली. मेंदूची हीच क्षमता अंतर्गत निर्णयासाठी देखील वापरली जाऊ शकते , ज्याला जागरूकता म्हणतात. आपले विचार आणि भावना यांची जाणीवपूर्वक पुनरावृत्ती करून आपण आपल्या मेंदूची निर्णय क्षमता वाढवू शकतो. आजच्या आधुनिक युगात संगणकाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अशाच प्रकारे तंत्रज्ञान वापरले जात आहे. भगवान श्रीकृष्ण हे आंतरिक सामर्थ्य अभ्यासातून विकसित करण्याचे संकेत देत आहेत कारण ती नैसर्गिकरित्या येत नाही. न्यूरोसायन्सच्या दृष्टिकोनातून , हे नवीन न्यूरल पॅटर्न तयार करण्यासारखे आहे. वैराग्य समजून घेण्याची सोपी पद्धत म्हणजे त्याच्या अगदी विरुद्ध असलेला राग समजून घेणे. राग म्हण...

11. सुखापाठोपाठ येते दु:ख

Image
  द्वंद्वातीत म्हणजे द्वैताच्या पलीकडे जाणे , हे गीतेतील आणखी गुरुकिल्ली आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला विविध संदर्भात ही अवस्था प्राप्त करण्याचा सल्ला देतात. मानवतेला चकित करणारा सामान्य प्रश्न हा आहे की आपण आनंद मिळविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतानाही आपल्या जीवनात दुःख कसे येते. आत्मपरीक्षण करण्याऐवजी , कदाचित आपले प्रयत्न पुरेसे नाहीत असे सांगून आपण स्वतःला सांत्वना देतो. तथापि , आशा आणि अहंकार आपल्याला आनंदाच्या शोधाची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यास प्रवृत्त करतात आणि हे आयुष्यभर चालू राहते. द्वैताच्या पलीकडे समजून घेणे हा या समस्येवर उपाय आहे. प्रकट जगात , प्रत्येक गोष्ट त्याच्या मूलभूत स्वरूपात विरुद्ध ध्रुवांच्या जोडीच्या रूपात अस्तित्वात आहे , म्हणजे द्वैत. जन्माचा विरुद्ध ध्रुव म्हणजे मृत्यू ; सुखाचा विरुद्ध ध्रुव म्हणजे दुःख ; विजयाचा परा जय ; नफा तोटा ; बेरीज वजाबाकी ; प्रशंसा टीका ; सशर्त प्रेमाचा द्वेष ; अशी यादी मोठी आहे. आपण एखाद्या गोष्टीचा पाठलाग करीत असतो तेव्हा त्याच जोडीने त्याच्या अगदी विरुद्ध बाबही आपल्या मागेमागे येत असते हा नियम आहे. आपण एका बाजुने क...

10. कोरोनामध्ये श्रीकृष्ण

Image
‘स्व’ची जाणिव होण्याच्या मार्गावर जे काही अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी आणि शक्यतांचे अनेक दरवाजे उघडण्यासाठीची गुरुकिल्ली गीतेमध्ये आहे. अशीच एक गुरुकिल्ली म्हणजे इतरांमध्ये स्वत:ला बघणे आणि इतरांना स्वत:त. श्रीकृष्ण आपल्याला वारंवार सांगतात की आपल्या सगळ्यांमध्ये ‘तो’ विद्यमान आहे आणि जे प्रकट झालेले नाही अशा निराकार तत्त्वाकडे तो अंगुलीनिर्देश करतो आहे. इतर एका ठिकाणी तो असेही म्हणतो की जणू काही आपण देवापुढे झुकतो आहोत अशा पद्धतीने गाढवा किंवा चोरासमोर झुकावे. इंद्रियांद्वारे प्रसारित केलेल्या माहितीच्या आधारे , आपल्या मेंदूला परिस्थितीचे सुरक्षित/आनंददायी किंवा असुरक्षित/अप्रिय असे विभाजन करण्याचे प्रशिक्षण दिले गेले आहे. पुढे येणार्‍या धोक्यांपासून बचावासाठी असे करणे आवश्यक असते. कोणत्याही तंत्रज्ञानाप्रमाणेच मन हे दुधारी शस्त्र आहे आणि ते त्याची सीमा ओलांडून आपल्यावर अधिराज्य गाजवू बघत असते. अहंकाराचा जन्म अशाच ठिकाणी होतो. अनुभवांची विभागणी किंवा मूल्यमापन कमी करावे आणि एकत्व निर्माण व्हावे यासाठी आपण मनाला गुलाम बनवायला हवे असे ही गुरुकिल्ली सांगते. अशा एकत्वाशि...

9. मित्र आणि शत्रूची ओळख

Image
रडरला जोडलेल्या ट्रीम टॅबमधील लहान सा बदल ही मोठ्या जहाजाची दिशा बदलण्यास कारणीभूत ठरतो. त्याचप्रमाणे, श्रीमदभगवद्गीता अभ्यासण्याची आतून आलेली इच्छा ही तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते. अगदी बालवाडीपासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत स्वत:ला समजून घेण्यासाठी श्रीमदभगवद्गीता हे कायमस्वरुपी पाठ्यपुस्तक आहे आणि शक्य आहे की त्यातील फारच थोड्या संकल्पना तुम्हाला पहिल्यांदा वाचल्यावर कळतील . अव्यक्त आणि व्यक्त होण्याच्या दृष्टिकोनातून निरीक्षण केले तर ते सहज समजू शकतात. अव्यक्त म्हणजे जे आपल्या इंद्रियांच्या पलीकडे आहे आणि व्यक्त ते आहे जे इंद्रियांच्या कक्षेत आहे. प्रकट गोष्टींचा प्रारंभ हा बिग बॅंगपासून होतो. त्यामध्ये तारे, तार्‍यांच्या गाभ्यात असलेल्या उच्च रासायनिक घटकांच्या अणूंचे एकत्रीकरण, तार्‍यांच्या स्फोटांमध्ये या घटकांचा झालेला प्रसार, ग्रहमालांची निर्मिती आणि बुद्धियुक्त जीवन आकारास येणे अशा सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. संपूर्ण वैज्ञानिक समुहाने हे मान्य केले आहे की जरी काळाची अंदाजित परिमाणे बदलली तरीही प्रकट झालेले जीवन, ग्रह, तारे आणि अगदी विश्वदेखील अस्तित्...