112. आपल्यातील शत्रूपासून सावधान
श्रीकृष्ण म्हणतात की व्यक्ती स्वतःच्या उद्धारासाठी आणि स्वतःला अधोगतीला आणण्यासाठी जबाबदार आहे (6.5). ही जबाबदारी पार पाडण्यासाठी श्रीकृष्ण मार्गही सांगतात, ज्या जीवात्माने मन व इंद्रियांसह शरीर जिंकले , त्या जीवात्म्याचा तर तो स्वतःच मित्र आहे आणि ज्याने मन व इंद्रियांसह शरीर जिंकले नाही , त्याचे तो स्वतःच शत्रूप्रमाणे शत्रुत्व करतो ( 6.6 ) . महत्वाचे आहे स्वत:ला जिंकून घेणे. आत्मा हा शब्द श्लोक 6.5 आणि 6.6 मध्ये बारा वेळा येतो आणि त्याच्या विविध प्रकारच्या वापरामुळे विविध अर्थही निघतात. मात्र , साधकासाठी या श्लोकांमध्ये दिलेल्या संदर्भानुसार त्याचा अर्थ हा स्वत:ला जिंकून घेणे असाच आहे. श्रीकृष्ण म्हणतात , “ थंड-उष्ण , सुख-दुःख इत्यादी तसेच मान-अपमान यांमध्ये ज्याच्या अंतःकरणाची वृत्ती पूर्णपणे शांत असते अशा स्वाधीन आत्मा असलेल्या पुरुषाच्या ज्ञानात परमात्मा उत्तम प्रकारे अधिष्ठित असतो ; म्हणजेच त्याच्या ज्ञानात परमात्म्याशिवाय दुसरे काही नसतेच ” (6.7 ). याचा अर्थ सतत विद्यमान असलेल्या द्वंद्वांच्या पल्याड जाणे असाच आहे. सुख देणार्या अनेक लढाया अर्जुनाने जिंकल्या होत्या. ...