Posts

107. आनंदासाठी ध्यान

Image
  पीनियल ग्रंथी हा वाटण्या एवढा पाइन शंकूच्या आकाराचा अवयव आहे जो मेंदूच्या मध्यभागी , थेट दोन भुवयांच्या मध्यभागांच्या असतो. शारीरिकदृष्ट्या ते मेलाटोनिन आणि सेरोटोनिन हे न्यूरोट्रांसमीटर तयार करते जे अनुक्रमे झोपेच्या चक्रासाठी व मूडसाठी जबाबदार असतात. याला तिसरा डोळा असेही म्हणतात कारण त्यात सामान्य डोळ्याप्रमाणे फोटोरिसेप्टर्स असतात. प्रत्येक संस्कृतीत या जागेचे विविध प्रकारे आत्म्याची जागा म्हणून वर्णन केले आहे. ही जागा आपल्यातील आध्यात्मिक उन्नतीसाठी जबाबदार आहे. आपल्या पाच इंद्रियांपलीकडील ही सहावी संवेदना आहे. आध्यात्मिक जागरणाचे चिन्ह आहे. भौतिक आणि आध्यात्मिक जगाला जोडणारा दुवा आहे. भारतामधे , भुवयांच्यामधील या जागेला आज्ञाचक्र असे म्हणतात. ही पार्श्वभूमी समजून घेतल्यामुळे इंद्रिये आणि मनावर नियंत्रण ठेवण्याची श्रीकृष्णाची पद्धत आपल्याला कळून येईल. “ बाहेरच्या विषयभोगांचे चिंतन न करता ते बाहेरच ठेवून , दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून तसेच नाकातून वाहणारे प्राण व अपान सम करून ज्याने इंद्रिये , मन व बुद्धी जिंकली आहेत , असा मोक्षतत्पर मुनी इच्छा , भय आणि क्रोध ...

106. सुखाचा लगाम

Image
  मध्य आशियातून आलेल्या एका आक्रमकाने एकदा दिल्ली जिंकली आणि त्यानिमित्त त्याला विजययात्रा काढायची इच्छा झाली. सजवलेल्या हत्तीवर तो बसला आणि त्याने हत्तीचा लगाम मागितला. हत्तीचे नियंत्रण माहुताकडे आहे असे सांगितल्यावर त्याने लगेच हत्तीवरून खाली उडी मारली आणि लगोलग आपला घोडा बोलविला. तो म्हणाला, तो कधीही अशा स्वार होत नाही ज्याचे नियंत्रण दुसर्याच्या हातात आहे. त्याचप्रमाणे आपणही हा विचार करायला हवा की आपला सुख आणि भावना यांचे नियंत्रण आपल्या हाती आहे की इतरांच्या हाती आहे. आपल्यापैकी सगळ्यांना वाटते की लगाम आपल्या हाती आहे मात्र प्रत्यक्षात तो इतरांच्याच हाती असतो. एखादा मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा कामाच्या ठिकाणचा सहकारी, एखादा पदार्थ, पेय किंवा एखादी वस्तू, चांगली किंवा वाईट परिस्थिती, आपला भूतकाळ किंवा भविष्य यांपैकी कशाचाही आपल्या भावनांवर परिणाम होऊ शकतो. या संदर्भात श्रीकृष्ण म्हणतात की , “ जो साधक या मनुष्यशरीरात देहत्यागाआधी काम-क्रोधामुळे उत्पन्न होणारा आवेग सहन करण्यास समर्थ होतो, तोच योगी होय व तोच सुखी होय ”   ( 5.23 ) . इतरांकडून सुख मिळवण्याची इच्छा ही वा...

105. शाश्वत आनंद

Image
  श्रीकृष्ण म्हणतात की जे परमात्मामधे स्थिर झालेय, ज्यांना दैवी ज्ञानाची समज आली आहे आणि ते कोणत्याही संभ्रमात नाहीत, असे व्यक्ती काही प्रिय प्राप्त झाले तरी आनंदित होत नाहीत किंवा अप्रिय प्राप्तीमुळे उद्विग्न होत नाहीत ( 5.20 ) .   आपण परिस्थिती आणि लोकांची सुखद आणि अप्रिय अशी विभागणी करतो आणि शहाणा माणूस ही विभागणी सोडून देतो. आपले काय आहे आणि काय नाही याबद्दलच्या चुकीच्या आकलनामुळे निर्माण होणार्‍या मोहापासून दूर जाण्याचा सल्ला श्रीकृष्ण अर्जुनाला वारंवार देतो. आपण आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून सुख मिळवू शकतो हा आपला सगळ्यांत मोठा संभ्रम आहे. दुसर्‍या बाजूला श्रीकृष्ण जेव्हा म्हणतात की ज्याच्या अंत:करणाला बाहेरील विषयांची आसक्ती नसते असा साधक आत्म्यात असलेल्या, ध्यानामुळे मिळणार्‍या सात्विक आनंदाला प्राप्त होतो. योगाद्वारे भगवंताशी जोडले गेल्याने ते शाश्वत आनंद अनुभवतात ( 5.21 ) . श्रीकृष्ण सावध करतात की सांसारिक वस्तूंच्या संपर्कातून निर्माण होणारे सुख जरी सांसारिक लोकांना आनंददायी वाटत असले तरी प्रत्यक्षात ते दुःखाचे मूळ आहे. अशा सुखांना सुरुवात आणि शेवट असतो , म...

104. निष्पक्षता साधणे

Image
  श्रीकृष्ण म्हणतात की ज्याचे मन आणि बुद्धी ‘त्या’ परमतत्त्वाशी एकरूप झाले आहेत आणि परमात्म्यातच ज्यांचे नित्य ऐक्य झाले आहे, असे ईश्वरपरायण पुरुष ज्ञानाने पापरहित होऊन परम गतीला प्राप्त होतात ( 5.17 ) . जाणिवविहीन जगणे म्हणजे अंधारात जगण्यासारखे आहे, जेथे आपण सारखे धडपडतो आणि स्वतःला ईजा करून वघेतो . पुढचा टप्पा म्हणजे प्रकाशाच्या क्षणिक झोताप्रमाणे आपण जाणिवेचाही क्षणभर अनुभव घेतो आणि पुन्हा अज्ञानात ढकलले जातो. अंतिम स्थिती म्हणजे सूर्यप्रकाशासारखी सत्याची शाश्वत अनुभूती होणे जेथे जाणिव एका महत्वपूर्ण पातळीपर्यंत जाते आणि व्यक्ती तेथून परत येऊ शकत नाही. परत न येण्याच्या या अवस्थेला मोक्ष किंवा परम स्वातंत्र्य असेही म्हणतात. ही माझी मुक्ती नाही, उलट ‘ मी ’ पासून स्वातंत्र्य आहे कारण सर्व समस्या ‘ मी ’ मुळे आहेत. ही न परतण्याची पातळी गाठली की समत्व प्राप्त होते. या संदर्भात श्रीकृष्ण म्हणतात की ते ज्ञानी पुरुष विद्या व विनय यांनी युक्त असलेला ब्राह्मण , गाय , हत्ती , कुत्रा आणि चांडाळ या सर्वांनां समदृष्टीनेच पाहतात (5.18). समत्व हे गीतेच्या मूलभूत तत्त्वांपैकी एक आहे. सगळ...

103. पाप-पुण्याची मुळे

Image
  श्रीकृष्ण म्हणतात की , " परमेश्वर मनुष्यांचे कर्तेपण , कर्म किंवा कर्मफलांशी संयोग उत्पन्न करीत नाहीं ;. तर प्रकृतीच खेळ करीत असते" (5.14). परमेश्वर हा कर्ता नाही तर सृजनकर्ता किंवा सृजनशीलता आहे. दोन प्रकारेन निर्मिती होत असतात. पहिली , कुंभार जसे मातीच्या वस्तू तयार करतो आणि त्याची निर्मिती ही काही काळानंतर त्यांच्यापासून स्वतंत्र होते. दुस री , ज्याप्रकारे नर्तक किंवा नर्तकी नृत्याचे सर्जन करते पण ती व्यक्ती नसेल तर नृत्यही राहणार नाही. भगवंत हा नर्तकासारखा आहे आणि सगळे विश्व त्याच्यावर अवलंबून आहे मात्र तो त्या विश्वावर अवलंबून नाही. त्यामुळे, नृत्य करणार्‍या शिवाला नटराज आणि बासरी वाजविणार्‍या कृष्णाला मुरारी च्या रूपात चिन्हित केले जाते . भगवंत हा रासायनिक प्रक्रिया घडवून आणणार्‍या उत्प्रेर काचीही भूमिके सारखाही पाहिला जाऊ शकतो . उत्प्रेरकाचा उपस्थितीमुळे रासायनिक प्रक्रिया होते पण त्याचा उत्प्रेरकावर काहीही परिणाम होत नाही. श्रीकृष्ण म्हणतात सर्वत्र व्याप्त असे परमेश्वरी तत्त्व कुणाच्याही पाप-पुण्याचा हिशोब ठेवत नाही. माणसे संभ्रमित होतात कारण त्यांच्या ज्...

102. परिणाम समभावाने स्वीकारा

Image
  श्रीकृष्ण म्हणतात की , कर्मयोगी सङ्ग ( आसक्ती ) सोडून केवळ इंद्रिये , मन , बुद्धी आणि शरीर यांच्याद्वारा अंत:करणाच्या शुद्धीसाठी कर्म करतात (5.11). असा अर्थ घेतला आहे की एखाद्याने वर्तमानात जरी कोणत्याही आसक्तीविना कामे केली तरी त्याच्या पूर्वीचा कर्मबंधनांवर लक्ष्य ध्यावे लागते. त्यामुळे, तो कर्मे करीत राहतो. यामध्ये दुसरा ही एक दृष्टिकोण असा आहे की एकदा आसक्ती टाळली की भौतिक किंवा प्रकट जगात प्राप्त करण्यासारखे काही च उरत नाही आणि सगळ्या कृती या अंतरात्म्याच्या शुद्धीसाठी घटतात . श्रीकृष्ण पुढे म्हणतात की , “ कर्मयोगी   कर्मांच्या फलांचा त्याग करून भगवत्प्राप्तिरुप शांतीला प्राप्त होतो आणि कामना असलेला पुरुष कामनांच्या प्रेरणेमुळे फळांत आसक्त होऊन बद्ध होतो ” (5.12) . गीतेच्या मूलभूत स्तंभांपैकी एक म्हणजे आपल्या कर्मा वर आपले अधिकार आहे , परंतु आपल्या कृतींच्या परिणामांवर नाही (2.47) . कर्मफळाचा त्यागाचा अर्थ असा आहे की कोणत्याही विशिष्ट परिणामाला प्राधान्य नाही कारण कोणत्याही परिणा माला तो कितीही आश्चर्यकारक किंवा भयंकर असलातरी , समभावाने स्वीकारण्यास कर्मयोगी ...

101. कमलपत्राचे अनुकरण

Image
  जीवनासकट कोणतीही भौतिक व्यवस्था ही काही संसाधनांच्या साहाय्याने काही गोष्टींची निर्मिती करीत असते. आपण शब्द किंवा कृतींतून होणाऱ्या निर्मितीचे कायम मूल्यमापन करीत असतो. इतरांच्या कृती आणि आजूबाजूची परिस्थिती यांचेही आपण मूल्यमापन करीत असतो. खरे पाहता उत्क्रांतीच्या प्रक्रियेत धोक्यांचा अंदाज घेणे हे अस्तित्वासाठी फ़ारच महत्वाचे होते. पण खरा मुद्दा आहे तो कृतींचे मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या मानकांच्या अनुपलब्धतेचा. आपण मूल्यमापन करण्यासाठी बहुतांश वेळा अज्ञानावर आधारित आकलने आणि आपल्या श्रद्धा यांवर अवलंबून असतो. त्यांना पूरक अशा कृती आढळल्या तर आपण आनंदी आणि समाधानी होतो. या संदर्भात श्रीकृष्ण म्हणतात, “ज्याचे मन स्वत:च्या ताब्यात आहे, जो इंद्रियनिग्रही आणि शुद्ध अंत:करणाचा आहे, तसेच सर्व प्राण्यांचा आत्म रू प परमात्माच ज्याचा आत्मा आहे असा कर्मयोगी कर्मे करूनही अलिप्त राहतो” ( 5.7 ) .   त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपली कृती कलंकित होणार नाही , या संदर्भात देवाचे हे आश्वासन आहे. श्रीकृष्ण म्हणतात, जो पवित्र आणि शुद्ध आहे, म्हणजेच द्वेष आणि वासनांपासून मुक्त आ...