Posts

Showing posts from January, 2025

62. 'मी' चा त्याग

Image
  श्रीकृष्ण उत्तर देतात , मी आधी म्हटल्याप्रमाणे , या जगात मोक्षाचे दोन मार्ग आहेत - ज्ञानी लोकांसाठी ज्ञानाद्वारे आणि योगींसाठी कर्ममार्गाने ( 3.3 ). हा श्लोक सूचित करतो की जागृतीचा मार्ग बुद्धीचा वापर करणाऱ्यांसाठी आहे आणि कृतीचा मार्ग मनाचा वापर करणाऱ्यांसाठी आहे. श्रीकृष्ण पुढे स्पष्ट करतात की , केवळ कृती सुरू केल्याशिवाय मनुष्य निष्कर्म प्राप्त करू शकत नाही आणि केवळ त्याग करून सिद्धी प्राप्त करू शकत नाही (3.4). बलिदानाचा गौरव जवळजवळ सर्वच संस्कृतींमध्ये केला जातो कारण त्याग करणारा काहीतरी करू शकतो जे सामान्य व्यक्ती करू शकत नाही. म्हणूनच राज्याच्या सुखसोयींचा त्याग करण्याची आणि युद्धाच्या वेदना टाळण्याची अर्जुनाची दृष्टी आपल्याला आकर्षित करते. श्रीकृष्ण पण आपल्याला त्यागच करायला सांगतो मात्र तो प्रत्येक कृतीतून ‘मी’ वगळण्यावर भर देतो. कृष्णासाठी युद्ध हा फारसा महत्वाचा मुद्दा नाही तर अर्जुनामधील ‘मी’ हा महत्वाचा मुद्दा आहे. कृष्णासाठी, निर्मम आणि निरहंकार हा शाश्वत स्थितीचा मार्ग आहे ( 2.71 ) . आपल्या दैनंदिन आयुष्यात, पैसा, अन्न, वस्तू, सत्ता किंवा समाजात ज्याला मूल्य...

61. अनिश्चित मनासाठी निश्चितता

Image
  गीतेतील तिसरा अध्याय हा कर्मयोगाचा आहे जो श्लोक 2.71 चा विस्तार आहे. या श्लोकात श्रीकृष्ण सांगतात की ' निर्मम ' आणि ' निरहंकार ' हे शाश्वत स्थिती प्राप्त करण्याचे मार्ग आहेत. अर्जुनाने शंका उपस्थित केली की , जर तू बुद्धिमत्ता श्रेष्ठ मानतोस , तर मला युद्धाच्या भयंकर कार्यात का गुंतवतेस ( 3.1 ). मला गोंधळात टाकणारे भाषण न करता माझ्या कल्याणासाठी काय चांगले आहे ते तुम्ही मला निश्चितपणे सांगा ( 3.2 ). विभागणी नेहमीच तर्कहीन आणि आवेगपूर्ण निर्णय घेते कारण ते सत्यावर आधारित नसते. म्हणून श्रीकृष्ण ने विभागणी सोडण्याचा सल्ला दिला ( 2.50 ). अर्जुनाने युद्ध न करण्याचा निर्णय घेतला कारण त्याला युद्धात आपल्या नातेवाईकांना मारण्यात काही फायदा दिसत नाही ( 1.31 ). पुढे , तो त्याच्या निर्णयाच्या समर्थनार्थ अनेक औचित्य सादर करतो. वर्तमानाचा प्रश्नही चांगल्या आकलनाच्या शोधापेक्षा त्याच न्याय्यतेचा भाग वाटतो. आमची परिस्थिती अर्जुनपेक्षा वेगळी नाही कारण आम्ही भानावर येण्याआधीच धर्म , जात , कौटुंबिक स्थिती , राष्ट्रीयत्व , लिंग इत्यादींच्या आधारावर आमची ओळख निर्माण झाली होती आणि आ...

60. विषादातून ज्ञानप्राप्तीकडे

Image
  श्रीकृष्ण म्हणतात, “ ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी, सर्व बाजूंनी भरलेल्या व स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करताही सामावून जाते, त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करताच सामावून जातात, तोच पुरुष परमशांतीला प्राप्त होतो. भोगांची इच्छा करणारा नव्हे ( 2.70 ) . जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून, ममता, अहंकार आणि इच्छा टाकून राहत असतो, त्यालाच शांती मिळते ( 2.71 ) . हे अर्जुना! ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे. ही प्राप्त झाल्याने योगी कधी मोहित नाही. आणि अंतकाळीही या ब्राह्मी स्थितीत स्थिर होऊन ब्रह्मानंद मिळवतो ” ( 2.72 ) . हे समजून सांगण्यासाठी श्रीकृष्ण ने एक उदाहरणही दिले आहे. तो म्हणतो की समुद्र या शाश्वत स्थितीसारखा आहे. (मोक्ष- अंतिम मुक्ती , आणि आनंद) आणि नद्या या आपल्या इंद्रियांना सतत उत्तेजित करणा ऱ्या भावनांसारख्या आहेत. शाश्वत स्थितीला पोहोचल्यानंतर व्यक्ती समुद्रासारखी स्थिर आणि शांत होते , मग कितीही प्रलोभने आणि इच्छा निर्माण होवो. दुसरे म्हणजे जेव्हा नद्या समुद्राला मिळतात , त्या त्...

59. भौतिक जागेपण, आध्यात्मिक निद्रा

Image
  श्रीकृष्ण म्हणतात, “सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते, अशा नित्य ज्ञानस्वरुप परमानंदाच्या प्राप्तीत स्थितप्रज्ञ योगी जागतो आणि ज्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागतात, ती परमात्मतत्व जाणणार्‍या मुनीला रात्रीसारखी असते ” ( 2.69 ) . हे रुपक मांडून या श्लोकात शारीरिकदृष्ट्या जागे पण आध्यात्मिकदृष्ट् या झोपलेले आणि उलट अशी अवस्था सांगण्यात आली आहे. याचे शब्दश: अर्थही लावले जाऊ शकतात. जगण्याच्या दोन शक्यता असतात. एक, ज्यामध्ये आपण आपल्या सुखांसाठी इंद्रियांवर अवलंबून असतो आणि दुसरी अशी की आपले इंद्रियांवर अवलंबित्व नसते आणि ते आपल्या नियंत्रणात असतात. पहिल्या शक्यतेच्या गटात असणार्‍यांसाठी जगण्यची दुसरी पद्धत ही एक अनभिज्ञ, अज्ञात जग असते आणि अंधार/रात्र हे या अज्ञानाचे रुपक आहे. दुसरे म्हणजे , जेव्हा आपण एका इंद्रिय वापरतो तेव्हा आपले लक्ष इतरत्र असते याचा अर्थ ते यांत्रिकपणे वापरले जाते परंतु जागरूकतेने नाही. उदाहरणार्थ , जेवताना आपण अनेकदा अन्नावर लक्ष केंद्रित करत नाही. हे फोन संभाषण , वर्तमानपत्र किंवा टीव्ही असू शकते कारण आम्ही मल्टीटास्किं...