62. 'मी' चा त्याग
श्रीकृष्ण उत्तर देतात , मी आधी म्हटल्याप्रमाणे , या जगात मोक्षाचे दोन मार्ग आहेत - ज्ञानी लोकांसाठी ज्ञानाद्वारे आणि योगींसाठी कर्ममार्गाने ( 3.3 ). हा श्लोक सूचित करतो की जागृतीचा मार्ग बुद्धीचा वापर करणाऱ्यांसाठी आहे आणि कृतीचा मार्ग मनाचा वापर करणाऱ्यांसाठी आहे. श्रीकृष्ण पुढे स्पष्ट करतात की , केवळ कृती सुरू केल्याशिवाय मनुष्य निष्कर्म प्राप्त करू शकत नाही आणि केवळ त्याग करून सिद्धी प्राप्त करू शकत नाही (3.4). बलिदानाचा गौरव जवळजवळ सर्वच संस्कृतींमध्ये केला जातो कारण त्याग करणारा काहीतरी करू शकतो जे सामान्य व्यक्ती करू शकत नाही. म्हणूनच राज्याच्या सुखसोयींचा त्याग करण्याची आणि युद्धाच्या वेदना टाळण्याची अर्जुनाची दृष्टी आपल्याला आकर्षित करते. श्रीकृष्ण पण आपल्याला त्यागच करायला सांगतो मात्र तो प्रत्येक कृतीतून ‘मी’ वगळण्यावर भर देतो. कृष्णासाठी युद्ध हा फारसा महत्वाचा मुद्दा नाही तर अर्जुनामधील ‘मी’ हा महत्वाचा मुद्दा आहे. कृष्णासाठी, निर्मम आणि निरहंकार हा शाश्वत स्थितीचा मार्ग आहे ( 2.71 ) . आपल्या दैनंदिन आयुष्यात, पैसा, अन्न, वस्तू, सत्ता किंवा समाजात ज्याला मूल्य...