Posts

Showing posts from October, 2024

50. राग, भय आणि क्रोध

Image
  श्रीकृष्ण म्हणतात की , दु:खदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद होतो नाही , सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही , तसेच ज्याचे प्रीती , भय व क्रोध नाहीसे झाले आहेत , असा मुनी स्थिरबुद्धी म्हटला जातो (2.56). हा श्लोक 2.38 चाच विस्तार आहे ज्यामध्ये श्रीकृष्ण असे म्हणतात सुख आणि दु:ख , लाभ आणि हानी , जय आणि पराजय यांकडे समान  भावाने बघावे. आपण सर्वजण सुखाचा शोध घेतो पण दु:ख आपल्या जीवनात अपरिहार्यपणे येते कारण हे दोन्ही द्वैतांच्या जोडीने अस्तित्वात असतात. हे मासा पकडण्यासाठी लावलेल्या आमिषासारखे आहे जेथे आमिषाच्या मागे आकडा लपलेला असतो. स्थितप्रज्ञ तो असतो जो या द्वंद्वांच्या पल्याड जातो आणि द्वंद्वातीत ही स्थिती प्राप्त करतो. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची इच्छा धरतो तेव्हा त्यापा ठो पाठ दुसरी गोष्ट येणार हे निश्चित असते, मग त्याचा आकार, वेळ वेगळी असूही शकते. जेव्हा आपण आपल्या योजनेने आनंद मिळवतो तेव्हा अहंकार उत्तेजित होतो , जो उत्साह असतो , परंतु जेव्हा त्याचे दुःखात रूपांतर होते तेव्हा अहंकार दुखावतो , जो दुःख असतो. हा काही नसून अहंकाराचा खेळ आहे. हे समजून ज्ञा...

49. स्थितप्रज्ञा ही आंतरिक घटना आहे

Image
  अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीकृष्ण म्हणतात की स्थितप्रज्ञ हा स्वत:बद्दल समाधानी असतो ( 2.55 ). यातील गंमतीचा भाग असा की स्थितप्रज्ञ चालतो-बोलतो कसा या अर्जुनाच्या प्रश्नाला मात्र श्रीकृष्ण काहीच उत्तर देत नाही. ‘स्वत:बद्दल समाधानी’ ही पूर्णपणे अंतर्गत प्रक्रिया आहे आणि बाह्य वर्तनावरून तिचे अनुमान किंवा आकलन अजिबात शक्य नाही. एखाद्या परिस्थिती अज्ञानी मनुष्य आणि स्थितप्रज्ञ सारख्याच भाषेत बोलू शकतो, एकसारखाच चालू–वागू शकतो. या परिस्थितीमुळे आपल्या मनात स्थितप्रज्ञतेबद्दल अधिकच गुंतागुंत निर्माण होते. कृष्णाचे आयुशःय हे स्थितप्रज्ञतेचे सर्वोत्तम उदाहरण आहे. तो जन्मत:च आपल्या पालकांपासून दूर झाला. ‘त्याला ‘माखनचोर’ म्हणून ओळखले गेले. त्याचे प्रेम, नृत्य आणि बासरी या सगळ्यांच्या कथा झाल्या, मात्र जेव्हा त्याने वृंदावन सोडले त्यानंतर तो या प्रेमासाठी कधीही परत आला नाही. गरज होती तेव्हा तो लढला आणि जीवही घेतले, पण विविध वेळी त्याने युद्ध टाळले आणि त्यातून त्याला रणछोडदास असेही नाव मिळाले. त्याने अनेक चमत्कार दाखवले आणि मित्र म्हणूनही तो सर्वोत्तम होता. लग्न करायची वेळ आल...

48. स्वतःवर समाधानी

Image
  भगवान श्रीकृष्ण ने 2.11 से 2.53 पर्यंत सांख्ययोग प्रकट केला , जो अर्जुनासाठी पूर्णपणे नवीन होता. अर्जुनाला हे जाणून घ्यायचे होते की समाधी घेतलेल्या स्थितप्रज्ञाची वैशिष्ट्ये कोणती आहेत आणि स्थितप्रज्ञ कसे बोलतो , बसतो आणि चालतो (2.54). अर्जुनाला   स्पष्टीकरणाद्वारे (2.55) , श्रीकृष्ण आपल्या तुलना-शोधक मनाला मदत करण्यासाठी मानक निर्धारित   करतात. या मानकांद्वारे आपण आपल्या आध्यात्मिक प्रवासाची प्रगती मोजतो. श्रीकृष्ण म्हणतात , " ज्या वेळी मनुष्य मनातील सर्व इच्छांचा पूर्णपणे त्याग करून आत्म्यात तृप्त राहतो , त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात" (2.55). जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःमध्ये समाधानी असते तेव्हा इच्छा आपोआप संपतात. इच्छा संपल्या की त्यांच्या सर्व क्रिया नि:स्वार्थी कृती बनतात. आपण जे आहोत त्यापेक्षा आपल्या मूलभूत इच्छा वेगळ्या असतात. आपल्याला लवकरच कंटाळा येतो. अर्थशास्त्रात याला “इच्छा पूर्ण झाल्या की प्रेरणाही संपते” असे म्हटले जाते. मूलत: प्रत्येक जण ही बाब दुसर्‍याकरिता एक क्लृप्ती म्हणून वापरतो ज्यामुळे स्थितप्रज्ञतेची अवस्था गाठणे अशक्य होते. उदाहरणार्थ, ग्रा...

47. भ्रम टाळा

Image
  आपल्या जीवनाच्या सामान्य वाटचालीत जेव्हा आपण एकाच विषयावर परस्परविरोधी मते ऐकतो तेव्हा आपण गोंधळून जातो - मग ते बातम्या , तत्त्वज्ञान , अनुभव आणि इतरांचे विश्वास असो. श्रीकृष्ण म्हणतात की भिन्न मत ऐकूनही जेव्हा बुद्धी शांत आणि समाधीमध्ये स्थिर राहील तेव्हाच आपल्याला योगाची प्राप्ती होईल (2.53). ही बाब समजून सांगण्यासाठी झाड हे एक उत्तम रुपक आहे. झाडाचा वरचा भाग आपल्याला दिसत असतो तर मुळांसह खालचा भाग हा जमिनीखाली असल्याने आपल्याला दिसत नाही. वार्‍याचा जोर जितका असेल तितका वरच्या भागावर परिणाम होत असतो मात्र मुळांवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. वरचा भाग बाह्य शक्तींमुळे हलत राहतो तर आतला भाग हा समाधीमध्ये निश्चल असतो आणि स्थैर्य व पोषण देण्याचे आपले काम करत राहतो. झाडांसाठी हीच योगस्थिती आहे जेथे बाहेरील भाग हलतो आहे आणि आतील भाग निश्चल आहे. आपण अज्ञानी असताना आपली बुद्धिमत्ताही दोलायमान असते जी बाहेरील शक्तींच्या दबावामुळे आपोआप कंप पावत राहते. बाह्य जगाला ही दोलायमान स्थिती रागामुळे आणि पटकन येणार्‍या प्रतिक्रियांमुळे सहज लक्षात येते. यातून आपले आणि आपले कुटुंबीय आणि सहकार...

46. काय आमचे, काय नाही

Image
  श्रीकृष्ण म्हणतात , " जेव्हा तुमची बुद्धी भ्रमाच्या दलदलीतून पूर्णपणे ओलांडली जाईल , त्या वेळी तुम्ही या जगाच्या आणि परलोकातील सर्व सुखांपासून त्याग (निर्वेदम) प्राप्त कराल जे तुम्ही ऐकले आहे आणि ऐकणार आहात" (2.52). याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण आसक्तीवर मात करतो तेव्हा आपल्या इंद्रियांद्वारे निर्माण होणाऱ्या संवेदना आपल्या इच्छेनुसार आपल्यावर प्रभाव टाकण्याची शक्ती गमावून बसतात. अहंकाराप्रमाणेच मोहाचेही योग्य शब्दांचे वर्णन करणे शक्य होत नाही. मूलत:, आपले काय आणि परके काय याच्यात फरक न करता येण्याची कमतरता आहे. वर्तमान आणि भविष्यातील भौतिक गोष्टी आणि भावनांबद्दलची ती मालकी हक्काची भावना आहे. खरे पाहता आपण काही त्यांचे मालक नाही. जे आपले नाही त्यावरही आपण हक्क गाजविण्याचा प्रयत्न करतो पण प्रत्यक्षात आपले काय आहे- देही/आत्मा/प्राण- याची आपल्याला पुसटशीही जाणिव नसते. श्रीकृष्ण या प्रक्रियेला ‘ कलीलम ’ किंवा आध्यात्मिक अंधार म्हणतात. श्रीकृष्ण पुढे म्हणतात की हा अंधार दूर केल्यावर आपल्याला ‘ निर्वेदम ’ प्राप्त होतो. जरी निर्वेदाचे वर्णन उदासीनता असे केले गेले असले तरी ,...

45. जन्म-मृत्यूचे भ्रामक बंध

Image
  श्रीकृष्ण म्हणतात , “ समबुद्धी असलेला , कर्मांच्या फळाचा त्याग करून जन्माच्या बंधनातून मुक्त होऊन , कोणत्याही दुर्गुणांशिवाय परम स्थितीला प्राप्त होतो ” ( 2.51). बर्याच काळापासून , मानवजातीचा असा विश्वास होता की सूर्य स्थिर पृथ्वीभोवती फिरतो आणि नंतर शोधला की ही पृथ्वीच सूर्याभोवती फिरते. सरतेशेवटी , आमची समज अस्तित्त्विक सत्याशी जुळली , याचा अर्थ असा की समस्या आमच्या संवेदनांच्या मर्यादांमुळे निर्माण झालेल्या गोंधळामुळे उद्भवलेल्या सत्याच्या चुकीच्या व्याख्यामुळे होती. जन्म-मृत्यूबद्दलच्या आपल्या भ्रमाचेही असेच आहे. श्रीकृष्ण गीतेचा प्रारंभ ‘देही’ संकल्पनेचे वर्णन करून करतात (जो शरीरात असतो-आत्मा). हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही. कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही. ( 2.20 ). ते पुढे म्हणतात की,ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवी वस्त्रे धारण करतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसर्‍या नव्या शरीरात जातो ( 2.22 ). जेव्हा तो म्हणतो ...