Posts

Showing posts from November, 2024

53. इंद्रिय विषयांच्या लालसेचा त्याग

Image
  श्रीकृष्ण म्हणतात , जो व्यक्ती इंद्रियांद्वारे विषयांची सेवन करत नाही त्याच्यापासून इंद्रिय वस्तू निघून जातात , परंतु रस ( लालसा ) दूर होत नाही आणि जेव्हा व्यक्ती परमात्म्याची प्राप्ती करते तेव्हाच तृष्णा संपते (2.59). इंद्रियांना एक भौतिक साधन आणि नियंत्रक आहे. मन हे सर्व इंद्रियांच्या नियंत्रकांचे संयोजन आहे. श्रीकृष्ण आपल्याला तृष्णा टिकवून ठेवणाऱ्या नियंत्रकावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देतात. श्रीकृष्ण ने ‘रस’ हा शब्द वापरला आहे ज्याचा लाक्षणिक अर्थ फळांचा रस असा आहे. पिकलेले फळ कापल्यानंतर ते पिळेपर्यंत त्याचा रस दिसून येत नाही. दुधातील लोण्याचेही तसेच आहे. रस ही इंद्रियांमध्ये विद्यमान असणारी आंतरिक ओढ आहे. अज्ञानी अवस्थेत, इंद्रियेही बाह्य वस्तूंशी जुळलेली असतात आणि सुख-दु:खाच्या अवस्थामध्ये सतत हिंदकळत असतात. नंतर नंतर मिष्ठान्नासारख्या बाह्य वस्तू या पैसे नसणे किंवा डॉक्टरांनी दिलेला सल्ला यामुळे दूर सारल्या जातात मात्र मिष्ठान्नांबद्दलची ओढ कायम राहते. बाह्य स्थितींमध्ये नैतिकता, देव/कायदा/प्रतिष्ठा यांची भीती, वय वाढणे, परिस्थिती अशांचा समावेश होऊ शकतो. श्रीक...

52. गुंडाळणे शहाणपण आहे

Image
  श्रीकृष्ण म्हणतात , “ ज्याप्रमाणे कासव सर्व बाजूंनी आपले अंग काढून घेतो , त्याचप्रमाणे मनुष्य जेव्हा आपल्या इंद्रियांच्या वस्तूंपासून सर्व बाजूंनी आपली इंद्रिये काढून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर होते ” ( 2.58). श्रीकृष्ण इंद्रियांवर भर देतात कारण ते आपले अंतरंग आणि बाह्य जग यांच्यातील प्रवेशद्वार आहेत. श्रीकृष्ण सांगतो की जेव्हा आपण स्वतःलाच्या इंद्रियांना उपभोगवस्तूंची आसक्ती व्हायला लागते तेव्हा आपण आपल्या संवेदनावर ताबा मिळविला पाहिजे जसे की कासव धोक्यार्चा जाणीव झाल्यावर आपले अवयव आत ओढून घेते. इंद्रियांचे दोन भाग असतात. एक म्हणजे नेत्रगोलक आणि दुसरे नियंत्रक , मेंदूचा भाग जो या नेत्रगोलकावर नियंत्रण ठेवतो. संवेदी परस्परसंवाद दोन स्तरांवर होतो. एक इंद्रिय म्हणजे वस्तूंचे सतत बदलणारे बाह्य जग आणि संवेदना साधन (नेत्रगोलक) जे पूर्णपणे स्वयंचलित आहे. जेव्हा फोटॉन नेत्रगोलकापर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांच्या भौतिक गुणधर्मांनुसार प्रभाव पडतो. दुसरे संभाषण नेत्रगोलक आणि त्याचे नियंत्रक यांच्यात घडते. पाहण्याची इच्छा हे डोळ्याच्या विकासाचे कारण आहे आणि ती इच्छा इंद्रियांच्...

51. द्वेष हे देखील एक बंध आहे

Image
  परिस्थिती , व्यक्ती किंवा कृतीचा परिणाम यासाठी आम्ही तीन प्रकारचे वर्गीकरण करतो. हे शुभ , अशुभ किंवा कोणतेही वर्गीकरण नाही. श्रीकृष्ण या तिसर्‍या अवस्थेचा उल्लेख करतात आणि म्हणतात की एक बुद्धिमान व्यक्ती तो आहे जो चांगल्याच्या प्राप्तीवर आनंदाने भरलेला नाही किंवा तो वाईटाचा तिरस्कार करत नाही (2.57). तो नेहमी आसक्तीशिवाय राहतो. याचा अर्थ असा की , स्थितप्रज्ञा विभाजनाचा त्याग करते आणि वस्तुस्थितीला तथ्य मानते , कारण विभाजन हे सुख आणि दुःखाच्या ध्रुवांचे जन्मस्थान आहे (2.50). नैतिक आणि सामाजिक संदर्भातही कोणत्याही गोष्टीला चांगले किंवा वाईट यांमध्ये विभागणे हा आपला नैसर्गिक स्वभाव आहे आणि हा श्लोक अगदी त्याच्या विरुद्ध आहे आणि म्हणून समजण्यास कठीण आहे. वाईट म्हटली गेलेली व्यक्ती किंवा परिस्थिती समोर येते तेव्हा आपोआपच नावड, तिरस्कार आणि राग जन्माला येतो. याउलट, स्थितप्रज्ञ अशी कोणतीच ठिगळे लावत नसल्याने या गोष्टींबद्दल त्याच्या मनात राग उत्पन्न होत नाही. असेच, काही चांगले जरी घडले तरी स्थितप्रज्ञ अवास्तव आनंदी होत नाही. उदाहरणार्थ, काळानुसार आपल्या सगळ्यांचे वय नैसर्गिकपणे वाढत ...