53. इंद्रिय विषयांच्या लालसेचा त्याग
श्रीकृष्ण म्हणतात , जो व्यक्ती इंद्रियांद्वारे विषयांची सेवन करत नाही त्याच्यापासून इंद्रिय वस्तू निघून जातात , परंतु रस ( लालसा ) दूर होत नाही आणि जेव्हा व्यक्ती परमात्म्याची प्राप्ती करते तेव्हाच तृष्णा संपते (2.59). इंद्रियांना एक भौतिक साधन आणि नियंत्रक आहे. मन हे सर्व इंद्रियांच्या नियंत्रकांचे संयोजन आहे. श्रीकृष्ण आपल्याला तृष्णा टिकवून ठेवणाऱ्या नियंत्रकावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देतात. श्रीकृष्ण ने ‘रस’ हा शब्द वापरला आहे ज्याचा लाक्षणिक अर्थ फळांचा रस असा आहे. पिकलेले फळ कापल्यानंतर ते पिळेपर्यंत त्याचा रस दिसून येत नाही. दुधातील लोण्याचेही तसेच आहे. रस ही इंद्रियांमध्ये विद्यमान असणारी आंतरिक ओढ आहे. अज्ञानी अवस्थेत, इंद्रियेही बाह्य वस्तूंशी जुळलेली असतात आणि सुख-दु:खाच्या अवस्थामध्ये सतत हिंदकळत असतात. नंतर नंतर मिष्ठान्नासारख्या बाह्य वस्तू या पैसे नसणे किंवा डॉक्टरांनी दिलेला सल्ला यामुळे दूर सारल्या जातात मात्र मिष्ठान्नांबद्दलची ओढ कायम राहते. बाह्य स्थितींमध्ये नैतिकता, देव/कायदा/प्रतिष्ठा यांची भीती, वय वाढणे, परिस्थिती अशांचा समावेश होऊ शकतो. श्रीक...