Posts

Showing posts from March, 2025

69. अभिनेता आणि प्रेक्षकही

Image
  आपल्या दैनंदिन जीवनात आपण आपल्या आवडीच्या काही कृतींशी संलग्न होतो , ज्याचे वर्णन ' आसक्ती ' असे केले जाते किंवा आपल्या द्वेषामुळे आपण काही कृतींपासून दूर जातो , ज्याचे वर्णन ' विरक्ती ' असे केले जाते. परंतु , श्रीकृष्णाने तिसर्‍या अवस्थेचा उल्लेख केला आहे , ज्याला ‘ अनाशक्ती ’ म्हणतात , जी आसक्ती आणि विरक्ती पलीकडे आहे. ते म्हणतात , “ जसा अज्ञानी माणूस कृतीत गुंतलेला असतो , त्याचप्रमाणे लोक एकत्र करू इच्छिणार्‍या अनासक्त विद्वानानेही तसे वागावे ” ( 3.25 ) . आसक्ती आणि विरक्ती अशा दोन्हींमधून केलेल्या कृतीमुळे आपल्याला दु:ख भोगावे लागू शकते. प्रिय व्यक्ती (आसक्ती) समोर असेल तर आपल्याला आनंद होतो आणि ती तशी नसेल तर आपण दु:खी होतो. त्याचप्रमाणे, जी व्यक्ती आपल्याला आवडत नाही (विरक्ती) ती समोर असेल तर आपण दु:खी होतो आणि ते नसतील तर आपल्याला दिलासा मिळतो. त्यामुळे, आसक्ती आणि विरक्ती या दोन्हींमुळे आपण आनंद आणि दु:ख या दोन टोकांमध्ये हिंदकळत राहतो. श्रीकृष्ण आपल्याला   या दोन्हींच्या   पल्याड जाण्याचा सल्ला देतो आणि कृती करताना अनासक्त होण्यास सांगतो. अनाशक्तीने वागल्...

68. शब्द आणि कृतीत समानता

Image
  जग समजून घेण्यासाठी, नव्या गोष्टी, शिष्टाचार आणि वागणे शिकण्यासाठी, मुलांना आपल्या पालकांचा आधार वाटत असतो. त्यामुळे, मुलांचे संगोपन करण्याची सर्वोत्तम पद्धत म्हणजे पालकांनी ‘बोले तैसा चाले’ या उक्तीप्रमाणे वागणे. हे अवलंबित्व पुढील काळातही कायम राहते. कधी ते मित्रांवर असते, शिक्षकांवर असते तर कधी मार्गदर्शकांवर. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्यावर अवलंबून असणारे लोक नेहमीच असतात आणि त्यांना आपल्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा असते. आपण जे काही करू त्याचा त्यांच्यावर प्रभाव पडत असतो. या संदर्भात श्रीकृष्ण म्हणतात की, “ श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो, इतर लोकही त्याचे अनुकरण करत असतात. तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो, त्याप्रमाणेच सर्व मनुष्यसमुदाय वागू लागतो. त्याच्या कृती या जगातील इतरांसाठी आदर्शानुरुपच असतात ” ( 3.21 ) . श्रीकृष्ण पुढे विश्लेषण करतात, “त्रिलोकामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही जी मी केलेली नाही किंवा अजून मिळवायचे राहिले असेल असेही काही उरलेले नाही, आणि तरीही मी कर्म करत राहतो ( 3.22 ). जर एखाद्या वेळेस मी माझे काम करणे थांबवले तर लोकदेखील माझे अनुकरण करणे सुरू क...

67. संबद्ध आणि असंबद्ध

Image
  श्रीकृष्ण आपल्याला खात्री देतात की अनासक्तीने कृती केल्याने , म्हणजे आसक्ती आणि अलिप्ततेच्या पलीकडे जाऊन , व्यक्ती सर्वोच्च स्थितीला प्राप्त करतो (3.19) आणि राजा जनकाचे उदाहरण देतो , ज्याने केवळ कृतीद्वारे सिद्धी प्राप्त केली (3.20). श्रीकृष्ण सांगतात की विलासात मग्न असलेला आणि अनेक जबाबदाऱ्या असलेला राजासुद्धा सर्व कार्ये अलिप्ततेने करून परमात्म्याला प्राप्त करू शकतो. याचा अर्थ असा आहे की आपणही आपल्या परिस्थितीला न जुमानता याच मार्गाने सर्वोच्च स्थानी पोहोचू शकतो. इतिहासात अशी फार कमी उदाहरणे आहेत जिथे दोन ज्ञानी व्यक्तींनी संवाद साधला असेल. असाच एक संभाषण राजा जनक आणि ऋषी अष्टावक्र यांच्यात आहे , ज्याला अष्टावक्र गीता म्हणून ओळखले जाते , जे साधकांसाठी सर्वोत्तम मानले जाते. असे म्हणतात की एकदा एका गुरूंनी आपल्या एका शिष्याला , जो लंगोटी आणि भिक्षेची वाटी घेऊन राहत होता , राजा जनकाकडे त्याच्या शेवटच्या पाठासाठी पाठवले. तो जनकाकडे येतो आणि त्याला आश्चर्य वाटते की त्याच्या गुरूंनी त्याला या माणसाकडे का पाठवले जो ऐशोआरामात राहतो पण गुरूंच्या आज्ञेनुसार तो राजवाड्यातच राहतो. एक...