Posts

Showing posts from December, 2024

58. आयुष्याचे चार टप्पे

Image
  श्रीकृष्ण म्हणतात की , “ ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो , त्याचप्रमाणे विषयांत वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियाबरोबर राहते , ते एकच इंद्रिय या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेते ” (2.67) . वारा हे आपल्या इच्छांचे एक रूपक आहे जे आपल्या मनावर आणि इंद्रियांवर प्रभाव टाकते आणि बुद्धीला (बोट) अस्थिर करते. इच्छांच्या संदर्भात, आयुष्य हे चार टप्प्यांमध्ये विभागले गेले आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. ही विभागणी केवळ वयाच्या आधारे केली नसून जगण्याच्या तीव्रतेनुसार केली आहे. पहिल्या टप्प्यात आपली वाढ होत असते तसेच सैद्धांतिक ज्ञान, शारीरिक बल आणि काही मूलभूत कौशल्ये आपण मिळवीत असतो. दुसर्‍या टप्प्यात कुटुंब, काम, कौशल्यवृद्धी, वस्तू आणि आठवणींचा संग्रह, आयुष्याच्या विविध रुपांचे दर्शन, इच्छांमुळे मिळणारे अनुभव आणि त्यातून उत्पन्न होणारे यशापयश यांचा समावेश होतो. या प्रक्रियेतून, ज्ञान, कौशल्ये आणि आयुष्यातून अनुभवांचा मिश्र संग्रह आपल्याकडे जमा होतो आणि त्यातून आपल्यात जाणिवेचा जन्म होतो. तिसर्‍या टप्प्याला आपोआप प्रारंभ होत नाही. महाभा...

57. मध्यभागी केंद्रित

Image
  श्रीकृष्ण म्हणतात की अयुक्‍त (अस्थिर) माणसाला बुद्धी आणि भावना दोन्ही नसतात आणि परिणामी त्याला शांती मिळत नाही आणि अशांत माणसाला सुख मिळत नाही (2.66). श्रीकृष्ण ने समत्वावर जोर दिला (2.38 आणि 2.48) आणि हा श्लोक वेगळ्या दृष्टिकोनातून त्यावर प्रकाश टाकतो. जोपर्यंत माणूस मध्याशी केंद्रीत होत नाही तोपर्यंत तो मित्र , शत्रू , काम , जोडीदार , संतती , धन , सुख , सत्ता , संपत्ती अशा काही केंद्रांमध्ये स्वतःला स्थिर करून घेतो आणि हीच अयुक्ताची ओळख आहे. ज्याचे लक्ष पैशावर केंद्रित असते त्याच्या सगळ्या योजना आणि कृती या संपत्ती वाढविण्याभोवती फिरत असतात आणि नाती , आरोग्य इत्यादींकडे त्याचे दुर्लक्ष होते. केवळ भौतिक सुखाभिलाषी जो असतो तो ते मिळविण्या सा ठी फसवणे किंवा इतर काहीही करण्यास तयार असतो. जोडीदाराभिमुख व्यक्ती त्यांच्या जोडीदारासोबतच्या लोकांच्या वर्तनावर आधारित नातेसंबंधांचे मूल्यांकन करते. ज्याच्या मनात सदैव शत्रूचा विचार असतो तो कायम शत्रूचे नुकसान कसे करायचे याचाच विचार करीत असतो आणि या प्रयत्नात त्याचे स्वत:चे नुकसान होत असल्याचेही त्याला भान नसते. आपण जेव्हा इतरांशी बा...

56. अध्यात्मातील कारण आणि प्रभाव

Image
  श्रीकृष्ण म्हणतात , " जेव्हा मन आनंदी असते , तेव्हा माणसाचे सर्व दुःख नष्ट होतात आणि त्या आनंदी कर्मयोगीचे मन लवकरच इतर सर्व गोष्टींपासून दूर होऊन केवळ भगवंतात स्थिर होते" (2.65). आमचा विश्वास आहे की , एकदा आपल्या इच्छा पूर्ण झाल्या की आपण समाधानी होतो आणि आनंद प्राप्त करतो. पण श्रीकृष्ण आपल्याला आधी समाधानी व्हायला सांगतात आणि बाकी आपोआप होते. उदाहरणार्थ, आपल्याला ताप, वेदना असतील तर आपण आजारी आहोत असा निष्कर्ष आपण काढतो. या लक्षणांचे केवळ तात्पुरते दमन उपयोगाचे नाही तर त्यांच्यावर मुळापासून उपचार करणे गरजेचे आहे. दुसर्‍या बाजूला पोषक आहार, उत्तम झोप, शारीरिक तंदुरुस्ती या गोष्टी पाळल्या तर आपल्याला चांगले आरोग्य लाभू शकते. त्याचप्रमाणे, दु:खाचाच भाग असलेले भय, क्रोध आणि द्वेष ही समाधानी नसल्याची लक्षणे आहेत आणि त्यांच्या दमनाने आपण खरेखुरे समाधानी होऊ शकत नाही. आपले वर्तन नीट व्हावे म्हणून या लक्षणांच्या दमनाकरिता अनेक तातडीचे उपाय सांगितले जातात किंवा प्रत्यक्ष आचरणातही आणले जातात. मात्र, हे वरवरचे दमन नंतर पुन्हा आणखी जोमाने उफाळून येते. उदाहरणार्थ, आपल्या वरिष्ठांच...

55. दुष्चक्र आणि सद्गुणचक्र

Image
  दुष्टचक्र आणि सद्गुणचक्र म्हणजे घटनांची मालिकाच असते ज्यामध्ये एकापा ठो पाठ एक घटना घडत जातात आणि त्यातून एकतर दु:ख उत्पन्न होते किंवा आनंद मिळतो. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असतील तर त्यातून उधारी आणि कर्जाच्या दुष्टचक्रात आपण अडकत जातो. उत्पन्नापेक्षा खर्च कमी असेल तर त्यातून बचत होते आणि संपत्ती निर्माण होते. हे एक सद्गुणचक्र आहे. श्रीकृष्ण या चक्रांचा संदर्भ 2.62  ते 2.64 या श्लोकांमध्ये देतात. श्रीकृष्ण म्हणतात, “विषयाचे चिंतन करणार्‍या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे त्या विषयांची कामना उत्पन्न होते. कामना पूर्ण झाल्या नाहीत की राग उत्पन्न होतो. रागामुळे अत्यंत मूढता अर्थात अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो. आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अध:पात होतो ” ( 2.62-2.63 ) . हे अधःपतनाचे दुष्टचक्र आहे. दुसरीकडे, श्रीकृष्ण म्हणतात की, “ अंत:करण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या राग-द्वेष-रहित इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंत:करणाची प्रसन्नता प...

54. इंद्रियांची स्वयंचलितता

Image
  श्रीकृष्ण अर्जुनाला सावध करतात , " अशांत इंद्रिये , प्रयत्न करत असताना , बुद्धीमान माणसाचे मनही जबरदस्तीने काढून घेतात" (2.60). हा श्लोक उत्साहाने भरलेल्या इंद्रियांच्या स्वयंचलितपणाबद्दल आहे.   धुम्रपान करणार्‍यांचे उदाहरण याबाबत अत्यंत बोलके आहे. धूम्रपान करणार्‍याला त्याचे तोटे माहिती असतात, पण ते सोडणे त्याला खूप कठीण जाते आणि जेव्हा याची जाणिव त्याला किंवा तिला होते, तोपर्यंत सिगारेट पेटली असते. रस्त्यावरील भांडणे किंवा गुन्ह्यांमध्ये अडकलेला प्रत्येक जण हे पुष्टी करतो की ते त्या वेळच्या भावनेच्या भरात घडले, ठरवून केले नाही. कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबात कटु बोलणार्‍याचेही तसेच असते आणि नंतर त्याला खंत वाटत राहते कारण त्याला ते मुद्दाम करायचे नसते. या उदाहरणांवरून स्पष्ट होते की इंद्रिये आपल्यावर वर्चस्व गाजवतात आणि कर्मबंधनांत आपल्याला बांधून टाकतात. आपल्या सुरुवातीच्या काळात , मेंदूतील न वापरलेले न्यूरॉन्स चालण्यासारख्या स्वयंचलित क्रियाकलापांची काळजी घेण्यासाठी हार्ड वायरिंग नावाचे कनेक्शन बनवतात कारण यामुळे मेंदूची बरीच ऊर्जा वाचते. आयुष्याच्या उत्तरार्धात कौ...