58. आयुष्याचे चार टप्पे
श्रीकृष्ण म्हणतात की , “ ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो , त्याचप्रमाणे विषयांत वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियाबरोबर राहते , ते एकच इंद्रिय या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेते ” (2.67) . वारा हे आपल्या इच्छांचे एक रूपक आहे जे आपल्या मनावर आणि इंद्रियांवर प्रभाव टाकते आणि बुद्धीला (बोट) अस्थिर करते. इच्छांच्या संदर्भात, आयुष्य हे चार टप्प्यांमध्ये विभागले गेले आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. ही विभागणी केवळ वयाच्या आधारे केली नसून जगण्याच्या तीव्रतेनुसार केली आहे. पहिल्या टप्प्यात आपली वाढ होत असते तसेच सैद्धांतिक ज्ञान, शारीरिक बल आणि काही मूलभूत कौशल्ये आपण मिळवीत असतो. दुसर्या टप्प्यात कुटुंब, काम, कौशल्यवृद्धी, वस्तू आणि आठवणींचा संग्रह, आयुष्याच्या विविध रुपांचे दर्शन, इच्छांमुळे मिळणारे अनुभव आणि त्यातून उत्पन्न होणारे यशापयश यांचा समावेश होतो. या प्रक्रियेतून, ज्ञान, कौशल्ये आणि आयुष्यातून अनुभवांचा मिश्र संग्रह आपल्याकडे जमा होतो आणि त्यातून आपल्यात जाणिवेचा जन्म होतो. तिसर्या टप्प्याला आपोआप प्रारंभ होत नाही. महाभा...