Posts

Showing posts from June, 2024

28. परमात्म्याशी एकरूपता

Image
  श्रीकृष्ण स्वधर्म (2.31-2.37) आणि परधर्म (3.35) या बद्दल बोलतात आणि शेवटी सर्व धर्मांचा त्याग करून परमेश्वराशी एक होण्याचा सल्ला देतात (18.66). युद्ध करून आपल्या भावांना मारले तर आपल्या प्रतिष्ठेला हानी पोहोचेल या भीतीने अर्जुनाच्या मनात दुःख निर्माण झाले. श्रीकृष्ण त्याला सांगतात की तो युद्धातून पळून गेला तरी तो त्याच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवेल कारण युद्ध हा त्याचा स्वधर्म आहे (2.34-2.36). अर्जुनाला युद्धात सामील होण्यास घाबरला असे समाजाला वाटेल आणि युद्धाला घाबरणे हे क्षत्रियासाठी मृत्यूपेक्षाही भयंकर आहे असे प्रत्येकाला वाटेल. श्रीकृष्ण पुढे स्पष्ट करतात की , “ स्वधर्म जरी सदोष किंवा सद्गुण नसलेला असला तरी तो परधर्मापेक्षा श्रेष्ठ आहे आणि स्वधर्माच्या मार्गात मरण हे श्रेष्ठ आहे , कारण परधर्म भयावह आहे ” ( 3.35). बाह्यदृष्टी असलेल्या इंद्रियांमुळे , पर धर्म सोपे आणि चांगले दिसतात , विशेषतः जेव्हा आपण यशस्वी लोक पाहतो. पण आंतरिक स्वधर्मासाठी शिस्त आणि कठोर परिश्रम आवश्यक आहेत आणि ते आपल्यामध्ये हळूहळू प्रकट झाले पाहिजेत. आपली स्वत: ची मूल्याची कल्पना सहसा इतरांकडून...

27. स्वधर्माशी समन्वय

Image
  श्रीकृष्ण स्वधर्माचे स्पष्टीकरण देतात (2.31-2.37) आणि ते अर्जुनला सांगतात की अशी अवांछित लढाई स्वर्गाचे दार उघडते (2.32) आणि त्यापासून पळून गेल्याने स्वधर्म आणि कीर्ती नष्ट होईल आणि पाप होईल (2.33). रणांगणावर अर्जुनाला दिलेला हा उपदेश त्याच्या योग्य संदर्भात पाहण्याची गरज आहे. श्रीकृष्ण खरे तर स्वधर्माशी संदर्भात समन्वय आणि सुसंवादा बद्दल बोलत आहेत , युद्धाबद्दल नाही. श्रीकृष्णाला अर्जुनाचे विचार , शब्द आणि कृती यात विसंगती आढळते. तो अर्जुनाला सुसंगती आणण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. अर्जुनाच्या बाबतीत , स्वतःच्या धर्मानुसार युद्ध लढण्यात सुसंगती आहे आणि युद्धापासून पळून जाण्यात विसंगती आहे. खरं तर , समन्वय हा सृष्टीचा नियम आहे जिथे सर्वात लहान ‘ इलेक्ट्रॉन ’, ‘ प्रोटॉन ’ आणि ‘ न्यूट्रॉन ’ पासून ते मोठ्या आकाशगंगा , ग्रह आणि तारे एकसंध असतात. जेव्हा रेडिओ आणि रेडिओ स्टेशनचा ताळमेळ (ट्यून) असतो तेव्हाच आपण आपल्या आवडत्या संगीताचा आनंद घेऊ शकतो . मानवी शरीरापेक्षा समन्वयाचे कोणतेही मोठे उदाहरण नाही , ज्यामध्ये अनेक अवयव आणि रसायने असतात ज्यांच्या समन्वयात्मक कार्...

26. गुलाब कमळ होऊ शकत नाही

Image
  श्रीकृष्ण स्वधर्माविषयी बोलतात (2.31-2.37) आणि अर्जुनला सल्ला देतात की क्षत्रिय म्हणून त्याने लढायला संकोच करू नये (2.31) कारण हा त्याचा स्वधर्म आहे. श्रीकृष्ण गीतेचा प्रारंभ ‘त्या’पासून सुरू करतात जे शाश्वत, अप्रकट आहे आणि सर्वांना व्यापून आहे. समजायला सोपे जावे म्हणून त्याला ‘आत्मा’ असे म्हटले आहे. मग ते स्वधर्माबद्दल बोलतात जे ‘त्या’च्याएक पाऊल आधी आहे आणि मग ते कर्मापर्यंत पोहोचतात. आपल्या अंतरात्म्याला समजून घेण्याचा प्रवास तीन टप्प्यांमध्ये विभागता येतो. पहिला टप्पा म्हणजे आपली वर्तमान स्थिती, दुसरा टप्पा म्हणजे स्वधर्म समजून घेणे आणि अंतिम टप्पा म्हणजे, अंतरात्म्यापर्यंत पोहोचणे. आपली वर्तमान स्थिती म्हणजे आपला स्वधर्म, अनुभव, ज्ञान, आठवणी आणि आपल्या अचपळ मनाने जमविलेली गृहितके यांचे एकत्रीकरण आहे. जेव्हा आपण आपल्या मानसिक ओझ्यातून मुक्त होतो तेव्हा स्वधर्म हळूहळू स्पष्ट होतो. क्षत्रिय म्हणजे ‘ क्षत ’ आणि ‘ त्रय ’ यांचे संयोजन. क्षत म्हणजे ईजा आणि त्रया म्हणजे संरक्षण. क्षत्रिय म्हणजे इजेपासून संरक्षण देणारा. गर्भात असल्या पासून ते स्वावलंबी होईपर्यंत मुलांचे संर...

25. अहंकाराचा नाश, गंतव्याची प्राप्ती

Image
  श्रीकृष्ण म्हणतात , काहीजण याला (आत्मा) चमत्कार म्हणून पाहतात , काहीजण याला चमत्कार म्हणून बोलतात , काहीजण याला चमत्कार म्हणून ऐकतात , आणि तरीही कोणालाही ' हा ' अजिबात माहिती नाही (2.29). ' कोणीही नाही ' हा निरीक्षकाच्या संदर्भात आहे जो निरीक्षित (आत्मा) समजून घेण्यासाठी आपल्या इंद्रियांचा वापर करतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जोपर्यंत या दोघांमध्ये अंतर आहे तोपर्यंत पाहणारा , आत्मा समजू शकत नाही. एकदा मिठाने बनलेल्या एका बाहुलीच्या मनात समुद्रप्रवास करण्याची इच्छा निर्माण झाली आणि ती प्रवासाला निघाली. प्रचंड लाटांमधून मार्ग काढत ती समुद्राच्या आतल्या भागात गेली आणि हळूहळू त्यात विरघळत गेली. सर्वात खोल भागात पोहोचेपर्यंत ती पूर्ण विरघळली आणि समुद्राचाच एक भाग झाली. असेही म्हणता येईल की ती स्वत:च समुद्र झाली आणि मिठाच्या बाहुलीचे स्वतंत्र असे अस्तित्वच उरले नाही. निरीक्षक (मिठाची बाहुली) हाच निरीक्षित (समुद्र) झाला आहे, याचा अर्थ भेद नष्ट झाला आहे आणि एकत्व साधले गेले आहे. मिठाची बाहुली ही आपल्या अहंकारासारखी असते , जी नेहमी आपल्या संपत्ती , विचार आणि कृतींद्...

24. आत्मा बदलतो जुनी शरीरे

Image
  श्रीकृष्ण म्हणतात की आत्मा मारत नाही आणि मारला जात नाही आणि फक्त अज्ञानी लोक अन्यथा विचार करतात (2.19 , 2.20). तो अजन्मा , नित्य (अविनाशी) , शाश्वत आणि प्राचीन आहे. श्रीकृष्ण असेही म्हणतात की जसे आपण नवीन कपडे घालण्यासाठी जुने जीर्ण कपडे सोडून देतो , त्याचप्रमाणे आत्मा भौतिक शरीर बदलतो. वैज्ञानिक संदर्भात हे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आणि intercovertibility of mass and energy   च्या तत्त्वाने उत्तम प्रकारे समजून सांगता येईल. आत्मा हा ऊर्जेसमान आहे असे मानले तर भगवान श्रीकृष्णाचे म्हणणे अगदी स्पष्टपणे कळून येते. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असे म्हणतो की ऊर्जा ही कधीही नष्ट करता येत नाही केवळ ती एका रुपातून दुसर्‍या रुपात रुपांतरित करता येऊ शकते. उदाहरणार्थ, औष्णिक विद्युत प्रकल्प हे औष्णिक ऊर्जेला वीजेमध्ये रुपांतरित करतात. बल्ब वीजेला प्रकाशात रुपांतरित करतो. तर, हे केवळ एक रुपांतरण आहे, नष्ट करणे नाही. बल्बचे आयुष्य कमी असते. तो फ्युज होतो तेव्हा आपण नवीन बल्ब लावतो, मात्र, वीज कायम राहते. जुन्या कपड्यांच्या जागी आपण नवीन कपडे वापरण्यासारखेच हे आहे. आपल्यासाठी मृत्यू हा ...

23. आत्मा अव्यक्त आहे

Image
  श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की , हा आत्मा अव्यक्त , अचिन्त्य आणि विकाररहित आहे , असे म्हटले जाते. म्हणून , हे अर्जुना! हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे हे लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाही (2.25). श्रीकृष्ण पुढे म्हणतात , हे अर्जुना! सर्वच जीव हे त्यांच्या जन्मापूर्वी अप्रकट अवस्थेत असतात आणि मृत्युनंतरही अप्रकट होणार असतात. त्यांचा जन्म आणि मृत्यू यादरम्यानच ते प्रकट अवस्थेत असतात. मग अशा स्थितीत शोक कशाला करायचा (2.28) ? हे पटवून देण्यासाठी विविध संस्कृतींमध्ये समुद्र आणि लाटा यांचे उदाहरण देण्यात आले आहे. समुद्र हे अप्रकटाचे तर लाटा हे प्रकटाचे स्वरुप आहे. लाटा या समुद्रातून काही काळासाठी निर्माण होतात आणि त्या विविध आकार आणि तीव्रतेच्या असतात. आपली इंद्रिये केवळ अप्रकट गोष्टी म्हणजे लाटाच अनुभवू शकतात. अंतिमत: या लाटा ज्या समुद्रातून आल्या तेथेच विलिन होतात. त्याचप्रमाणे बीजामध्ये वृक्ष बनण्याची क्षमता असते. झाड बीजात सुप्त स्वरूपात असते. ते दिसते आणि झाडात वाढू लागते. अनेक बिया तयार केल्यानंतर ते शेवटी मरते. इंद्रिये त्यांच्या मर्यादित क्षमतेने ज्यांचा अनुभव घेऊ शकत...