81. ‘मी’ समाविष्ट आहे
गीतेमध्ये अर्जुन आणि श्रीकृष्ण असे दोघेही ‘मी’चा वापर करतात मात्र दोघांच्या ‘मी’चे अर्थ आणि संदर्भ वेगळे आहेत. अर्जुनाचा मी हा त्याचे शरीर, संपत्ती, भावना आणि मान्यता तसेच त्याचे कुटुंब, मित्र आणि नातेवाईकांशी निगडित आहे. आपली परिस्थितीदेखील अर्जुनापेक्षा वेगळी नाही. आपणही काही गोष्टी या आपल्याच आहेत आणि काही नाहीच असे समजतो. श्रीकृष्ण जेव्हा ‘मी’ चा उपयोग करतात तेव्हा ते सर्वसमावेशक असते. आपल्या इंद्रियांच्या मर्यादित क्षमतांमुळे आपल्याला भासणारे सर्व द्वंद्व आणि विरोधाभास तो सामावून घेतो. इतरत्र एका ठिकाणी श्रीकृष्ण जेव्हा असे म्हणतात की ‘मीच जन्म आहे आणि मीच मृत्यूही’ त्याचाही हा संदर्भ लक्षात घेतला पाहिजे. श्रीकृष्ण हा सागर असला तरी आपण त्याच सागराचे थेंब आहोत. पण अहंकारामुळे आपण स्वतःला वेगळे समजतो. जेव्हा एक थेंब आपले अस्तित्व सोडून समुद्रात मिसळतो तेव्हा तो महासागर बनतो. श्रीकृष्ण हे सूचित करतात जेव्हा ते म्हणतात , " माझा जन्म आणि कृती दैवी म्हणजेच अलौकिक आहेत , अशा प्रकारे तत्वांपासून जाणणारा मनुष्य , तो देह सोडल्यानंतर पुनर्जन्म प्राप्त करत नाही , पण फक्त मलाच प...