84. मुक्त आत्म्यांचे मार्ग
श्रीकृष्ण म्हणतात की, “ कर्मांच्या फळाची मला स्पृहा नाही. त्यामुळे कर्मांचे मला बंधन होत नाही. असा प्रकारे जो मला तत्त्वतः जाणतो , त्यालाही कर्मांचे बंधन होत नाही ” ( 4.14 ) . यातून, आपला कर्मांवर अधिकार असतो मात्र कर्मफलांवर नाही, हे श्रीकृष्णाचे म्हणणे अधोरेखित होते (2.47) . परमात्मा म्हणून तेही याचेच अनुकरण करतो. श्रीकृष्ण म्हणतात की जरी त्यांनी माणसांमध्ये विविध भेद निर्माण केले असले तरी तेदेखील कर्ता नाही आणि यातून त्यांना कर्तेपणाच्या भावनेचा अनुपस्थिती अधोरेखित करावयाचा आहे ( 4.13 ) . श्रीकृष्ण पुढे म्हणतात की , " पूर्वीच्या मुमुक्षूंनीसुद्धा (मुक्त आत्मा) असे जाणूनच कर्मे केली आहेत. म्हणून तुही पूर्वजांकडून नेहमीच केली जाणारी कर्मेचे कर" ( 4.15 ) . आपल्या आयुष्यात आपण सामान्यत: कर्मफल मिळविण्यासाठी कर्म करीत असतो. मात्र ज्या वेळेस आपल्याला कर्मफल सोडावयास सांगितले जाते त्या वेळेस आपण कर्माचाही त्याग करतो. मात्र, श्रीकृष्ण येथे त्यागाचे वेगळेच प्रतिमान मांडतो आणि आपण कर्मफल आणि कर्तेपणात गुंतून न पडता कर्म करत राहण्याचा उपदेश करतो. युद्ध लढण्याचा हे त्याचे अर...