Posts

Showing posts from August, 2025

84. मुक्त आत्म्यांचे मार्ग

Image
  श्रीकृष्ण म्हणतात की, “ कर्मांच्या फळाची मला स्पृहा नाही. त्यामुळे कर्मांचे मला बंधन होत नाही. असा प्रकारे जो मला तत्त्वतः जाणतो , त्यालाही कर्मांचे बंधन होत नाही ” ( 4.14 ) . यातून, आपला कर्मांवर अधिकार असतो मात्र कर्मफलांवर नाही, हे श्रीकृष्णाचे म्हणणे अधोरेखित होते (2.47) . परमात्मा म्हणून तेही याचेच अनुकरण करतो. श्रीकृष्ण म्हणतात की जरी त्यांनी माणसांमध्ये विविध भेद निर्माण केले असले तरी तेदेखील कर्ता नाही आणि यातून त्यांना कर्तेपणाच्या भावनेचा अनुपस्थिती अधोरेखित करावयाचा आहे ( 4.13 ) . श्रीकृष्ण पुढे म्हणतात की , " पूर्वीच्या मुमुक्षूंनीसुद्धा (मुक्त आत्मा) असे जाणूनच कर्मे केली आहेत. म्हणून तुही पूर्वजांकडून नेहमीच केली जाणारी कर्मेचे कर" ( 4.15 ) . आपल्या आयुष्यात आपण सामान्यत: कर्मफल मिळविण्यासाठी कर्म करीत असतो. मात्र ज्या वेळेस आपल्याला कर्मफल सोडावयास सांगितले जाते त्या वेळेस आपण कर्माचाही त्याग करतो. मात्र, श्रीकृष्ण येथे त्यागाचे वेगळेच प्रतिमान मांडतो आणि आपण कर्मफल आणि कर्तेपणात गुंतून न पडता कर्म करत राहण्याचा उपदेश करतो. युद्ध लढण्याचा हे त्याचे अर...

83. सत्यावर फुलते असत्य

Image
  आपल्या माहिती आहे की जगात सत्य आणि असत्य अशा दोन्ही गोष्टी आहेत. थोडे काळजीपूर्वक बघितले तर आपल्याला लक्षात येते की असत्य हे सत्याचा चुकीचा अर्थ लावण्यातून जन्माला येते. असा चुकीचा अर्थ हा एकतर परिस्थितीमुळे लावला जातो किंवा आपली इंद्रिये आणि मन यांच्या मर्यादांमुळे लावला जातो. साप-दोरीच्या प्रसिद्ध कथेत, दोरी हे सत्य आहे आणि साप हे असत्य. मात्र दोरीच्या सत्याशिवाय सापाचे असत्य अस्तित्वात येऊच शकत नाही. मात्र हे आपल्याला समजेपर्यंत, समाजाच्या आयुष्यात तर कधीकधी कित्येक पिढ्यांपर्यंत, आपल्या सगळ्या कृती आणि विचार हे असत्यावर आधारलेले राहतात. त्याचप्रमाणे, आपण कोणत्याही तंत्रज्ञानाचे उदाहरण घेतले तर त्याचा चुकीचा उपयोग हे असत्य आहे. ध्वनिक्षेपकाचा उपयोग चांगल्याचा प्रसार करण्यासाठी होऊ शकतो किंवा हिंसा भडकावण्यासाठीही. त्याचप्रमाणे, आजची समाजमाध्यमे चुकीच्या पद्धतीने वापरली तर असत्यालाच जन्म देतात. सत्य आणि असत्याचे हे आकलन श्लोक 4.13 समजून घेण्यासाठी आवश्यक आणि उपयुक्त आहे जेथे श्रीकृष्ण म्हणतात , मी गुण आणि कर्म यांच्या फरकावर आधारित चार वर्ण निर्माण केले आहेत , परंतु मला अकर...

82. जे पेराल, ते उगवेल

Image
  भौतिक घटक अंदाज करण्यायोग्य वर्तन आणि गुणधर्मांद्वारे शासित असतात. श्रीकृष्ण सर्वशक्तिमान आणि प्रकट यांच्यातील नातेसंबंधात अंतर्दृष्टी देतात जेव्हा ते म्हणतात , “ जे   भक्त मला जसे भजतात , मीही त्यांना तसाच भजतो. कारण सर्वच मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात ” (4.11). प्रथम , हे देवाकडून दिलेले आश्वासन आहे , भक्तीचा आपण कोणताही मार्ग अंगिकारला आणि हे सगळे मार्ग कितीही परस्परविरोधी वाटत असले तरीही, हे सगळे मार्ग अखेर अप्रकट अशा परमात्म्यापर्यंत पोहोचत असतात. दुसरे म्हणजे देव बहुमितीय आरशासारखा असतो ज्यामध्ये आपल्या सगळ्या भावना, विचार आणि कृतींचे प्रतिबिंब पडत असते. तिसरे म्हणजे आपण जेव्हा एखादे बी पेरतो, त्याचे पूर्ण झाड होण्यास वेळ लागतो आणि या प्रतीक्षेमुळेच आपल्याला परमतत्त्वाला पूर्ण समजून घेण्यात अपयश येत असते. आपण जर विनाशर्त प्रेम आणि श्रद्धा बाळगली तर आपल्यालाही असेच प्रेम आणि श्रद्धा मिळेल ज्यामुळे आपली आयुष्ये अधिक आनंदी होतील. आपण राग, भीती, तिरस्कार, क्रूरता किंवा असूया पेरली तर आपल्यालाही तेच मिळून आणि आयुष्य दु:खमय होईल. अशी अनेक उदाहरणे आपल्या...