2. लक्ष्य एक मार्ग अनेक
“सगळे रस्ते रोमकडेच जातात” या उक्तीप्रमाणे गीतेमध्ये सांगितलेले सगळे रस्ते हे आपल्या अंतरात्म्याकडेच जातात. यातील काही मार्ग हे विरोधाभासी असल्याचे आपल्याला वाटत राहते. मात्र, हे एक चक्र आहे ज्यानुसार कोणत्याही मार्गावरील प्रवास हा आपल्याला एकाच गंतव्याकडे घेऊन जातो. श्रीमदभगवद्गीता ही वेगवेगळ्या पातळीवर कार्य करीत असते. कधीकधी श्रीकृष्ण अर्जुनाच्या पातळीवर येतो तर कधी तो परमात्म्याचे रुप धारण करतो. या दोन्ही पातळ्या भिन्न वाटत असल्याने सुरुवातीला गीतेचा अर्थ लावण्यात आणि समजून घेण्यात अडचणी येतात. मागील शतकाच्या प्रारंभी वैज्ञानिकांना प्रकाशाला समजून घेतानाही अशाच अडचणी आल्या होत्या. सुरुवातीला हे सिद्ध झाले की प्रकाश हा तरंगाप्रमाणे आहे आणि पुढील काळात समोर आले की त्यामध्ये कणांचेही गुणधर्म आहेत. या दोन्ही बाबी एकमेकांच्या विरुद्ध असल्याचे भासते. मात्र, ज्या प्रकाशाला आपण इतके चांगल्या प्रकारे सरावलो आहे तो अंतर्विरोधाने भरलेला आहे. आयुष्याचेही तसेच आहे. एकदा एक हत्ती गावात शिरला आणि काही अंध व्यक्तींनी त्या हत्तीला ओळखण्यास किंवा समजून घेण्यास प्रारंभ केला. हत्ती...