72. धारणांचे कैदी
श्रीकृष्ण म्हणतात, “प्रकृतीच्या गुणांनी संमोहित झाले असतात ते गुणांत आणि कर्मांत आसक्त होतात. त्या चांगल्या रीतीने न जाणणार्या मंदबुद्धीच्या अज्ञान्यांचा पूर्ण ज्ञान असणार्या ज्ञानाने बुद्धिभेद करू नये” ( 3.29 ). खरा कर्ता असण्याबरोबरच, गुणांमध्ये संमोहित करण्याची आणि आपल्या खर्या स्वभावाचा विसर पाडण्याची शक्ती असते. एखाद्या गोष्टीचा प्रभाव कायम असेपर्यंत आपण संमोहितच असतो. श्रीकृष्ण अज्ञानी आणि बुद्धिमान लोकांबद्दल सांगतात. अज्ञानी गुणांचा मायेच्या प्रभावाखाली राहून अज्ञानींना असे वाटते की ते कर्ता आहेत (3.27). अज्ञानी लोकांना गोष्टी साध्य करायच्या असतात , महत्त्वाच्या असतात , मान्यता मिळवायची असते आणि हक्कांसाठी लढायचे असते. त्याचप्रमाणे , ते कुटुंबातील , कामाच्या ठिकाणांमधील आणि समाजातील इतरांना कर्ता समजतात आणि त्यांच्या अपेक्षांनुसार इतरांनी वागावे किंवा काम करावे अशी त्यांची अपेक्षा असते. जेव्हा असे होत नाही त्यातून अपराधभाव , खंत , राग आणि दु:ख निर्माण होते. जागरुकतेचा दुसरा टप्पा असा आहे की एखादी घटना घडल्यानंतर जागरुकता निर्माण होते जिथे हा कालावधी काही क्षण , व...