93. समाधान हेच अमृत
श्रीकृष्णाने गीता मध्ये दोन ठिकाणी यज्ञाचा उल्लेख केला आहे ( 3.9 ते 3.15 आणि 4.23 ते 4.32 ). काही उद्दिष्टांसह केलेली कृती आपल्या कर्मबंधनात टाकते असा इशारा तो देतो आणि कोणत्याही कृती आसक्तीशिवाय करण्याचा सल्ला देतो ( 3.9 ) . तो हे ही सूचित करतो की यज्ञाच्या निस्वार्थ कृतीत सर्वोच्च शक्ती आहे ( 3.15 ) आणि प्रारंभी विश्वाच्या निर्मात्याने हीच शक्ती वापरून सृष्टीची निर्मिती केली ( 3.10 ). त्याने यज्ञाची बरीच उदाहरणे दिली ( 4.23 ते 4.32 ) आणि शेवटी सांगितले की हे सगळे कृतीतून जन्माला येते आणि त्याची जाणिव असणे आपल्या मुक्तीकडे घेऊन जाते ( 4.32 ) . हे भगवंताने मुक्तीसाठी दिलेले आश्वासन आहे. शिवाय , पापाबाबत , श्रीकृष्णाने सूचित केले की , सुख-दुःख , लाभ-हानी , विजय-पराजय या द्वैतांमधील असंतुलनामुळे होणारी क्रिया म्हणजे पाप होय. परिणामी , कर्म बंधने अपराधीपणा , खेद , द्वेष आणि मत्सराच्या रूपात प्रकट होतात. ( 2.38 आणि 4.21 ). तो पुढे म्हणतो, “ ज्याने अंत:करण व इंद्रियांसह शरीर जिंकले आहे आणि सर्व भोगसामग्रीचा त्याग केला आहे, असा आशा नसलेला मनुष्य केवळ शरीरासं...