Posts

Showing posts from January, 2026

100. प्रतिक्रियेपासून सक्रियतेपर्यंत

Image
  आयुष्य हे दुतर्फा प्रक्रिया आहे. आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी घडत राहतात आणि आपण त्यांना प्रतिक्रिया देत राहतो. या संदर्भात, श्रीकृष्ण म्हणतात की , “ सांख्ययोगी तत्त्ववेत्त्याने पाहात असता , ऐकता असता , स्पर्श करीत असता , वास घेत असता , भोजन करीत असता , चालत असता , झोपत असता , श्वासोच्छ्वास करीत असता ( 5.8) , बोलत असता , टाकीत असता , घेत असता   तसेच डोळ्यांची उघडझाप करीत असताही सर्व इंद्रिये आपापल्या विषयात वावरत आहेत , असे समजून निःसंशय असे मानावे की , मी काहीच करत नाही ” (5.9). या अस्तित्ववादी श्लोकात, श्रीकृष्ण हा सत्य जाणणार्‍याच्या सर्वोच्च अनुभवाचे वर्णन करीत असतो. कौतुक किंवा टीका यातून निर्माण होणार्‍या भावनांचा आपण नित्य अनुभव घेत असतो. गोष्टीतला कावळा जसा कोल्ह्याने त्याच्या गाण्याची केलेली स्तुती ऐकून तोंडातला मांसाचा तुकडा खाली टाकून देतो, तसेच आपलेही कौतुक ऐकून होत असते. त्याचप्रमाणे, टीकेची पातळी आणि टीकाकाराची ताकद किती आहे यानुसार आपण त्यावर मौन, बोलून किंवा शारीरिक प्रतिक्रिया देतो. आपण या प्रेरणांना खरे आणि आपल्याच आहेत असे मानतो. त्या आपण जेव्हा वैयक्तिक...

99.कर्म नव्हे, द्वेष सोडा

Image
  अज्ञानामुळे व्यक्ती भौतिक गोष्टी जमवत जातो आणि त्यातून कर्मबंधनात अडकत जातो. जागृतीचे पहिले किरण जेव्हा त्याच्या आयुष्यात येतात, तेव्हा अर्जुनाप्रमाणेच ती व्यक्ती परित्यागाचा विचार करायला लागते. मात्र, त्याग नेमका कशाचा करायचा याबाबत संभ्रम असतो. साधारणत: सर्व कर्मे आणि कृतींचा त्याग केला जातो कारण आपण त्यांना आपल्याच मनाने चांगले किंवा वाईट ठरवत असतो. आणि त्यामुले, नको असलेल्या कर्मांचा त्याग करण्याकडे आपला कल असतो. दुसरीकडे , श्रीकृष्ण संन्यासाच्या संदर्भात एक वेगळी संकल्पना मांडतात आणि म्हणतात , " जो पुरुष कोणाचा द्वेष करीत नाही अनिकषाची अपेक्षा करीत नाही , तो कर्मयोगी नित्यसंन्यासी समजावा. कारण राग-द्वेष इत्यादी द्वंद्वांनी रहित असलेला पुरुष सुखाने संसारबंधनातून मुक्त होतो ( 5.3 ) . ज्या गोष्टीचा आपण सगळ्यात पहिले त्याग केला पाहिजे ती म्हणजे द्वेष होय. आपला धर्म, जात किंवा राष्ट्रीयत्व किंवा इतर कोणत्याही आपल्या मान्यतेनुसार नसलेल्या गोष्टी, या कशांबद्दलचाहि द्वेष असू शकतो. आपला व्यवसाय, लोक किंवा अवतीभवती घडणार्‍या गोष्टी यांपैकी कशाचाही द्वेष असू शकतो. वरवर भासणार्‍या व...

98. करणे किंवा न करणे

Image
  अर्जुन म्हणतो, हे कृष्णा, तू कर्मांचा त्याग करण्याचा कौतुक करतो (कर्मसंन्यास) आणि त्याच वेळी ती कर्मे करण्याचाही सल्ला देतो. यापैकी कोणता मार्ग श्रेष्ठ हे मला निश्चितपणे सांग ( 5.1 ) . याआधीही सांख्य आणि कर्म यांपैकी योग्य आणि निश्चित कल्याणकारक मार्ग कोणता हे निश्चितपणे   सांगण्याबद्दल अर्जुनाने श्रीकृष्णाकडे आग्रह धरला होता. ( 3.1 आणि 3.2). श्रीकृष्ण मात्र कर्माचा त्याग करण्याचा सल्ला देत नाही आणि उलट ते म्हणतात की कर्माचा त्याग करून कुणीही सिद्धी प्राप्त करू शकत नाही ( 3.4 ) . प्रत्येक जण त्यांच्या गुणांप्रमाणे त्याची कर्मे करण्यास बाध्य असतो ( 3.5 ) . अगदी मानवी शरीराची निगा राखायची असेल तरीही कर्मे करावीच लागतात ( 3.8 ) . कर्मसंन्यास हा सांख्य योगाचाच भाग आहे या श्रीकृष्णाच्या उत्तरातून बर्‍याच गोष्टी स्पष्ट होतात. वस्तुत: कर्माच्या दोन बाजू असतात. एक म्हणजे कर्ता आणि दुसरी कर्मफल म्हणजे कृतींचे फळ.   गुण हेच खरे कर्ते आहेत हे समजून आपल्या कर्तेपणाचा त्याग करणे याला अर्जुन कर्मसंन्यास म्हणतो. कर्मफलाची अपेक्षा न करता कर्म करणे याला तो कर्माचे सादरीकरण म्हणतो. ...