51. द्वेष हे देखील एक बंध आहे

 

परिस्थिती, व्यक्ती किंवा कृतीचा परिणाम यासाठी आम्ही तीन प्रकारचे वर्गीकरण करतो. हे शुभ, अशुभ किंवा कोणतेही वर्गीकरण नाही. श्रीकृष्ण या तिसर्‍या अवस्थेचा उल्लेख करतात आणि म्हणतात की एक बुद्धिमान व्यक्ती तो आहे जो चांगल्याच्या प्राप्तीवर आनंदाने भरलेला नाही किंवा तो वाईटाचा तिरस्कार करत नाही (2.57). तो नेहमी आसक्तीशिवाय राहतो. याचा अर्थ असा की, स्थितप्रज्ञा विभाजनाचा त्याग करते आणि वस्तुस्थितीला तथ्य मानते, कारण विभाजन हे सुख आणि दुःखाच्या ध्रुवांचे जन्मस्थान आहे (2.50).

नैतिक आणि सामाजिक संदर्भातही कोणत्याही गोष्टीला चांगले किंवा वाईट यांमध्ये विभागणे हा आपला नैसर्गिक स्वभाव आहे आणि हा श्लोक अगदी त्याच्या विरुद्ध आहे आणि म्हणून समजण्यास कठीण आहे. वाईट म्हटली गेलेली व्यक्ती किंवा परिस्थिती समोर येते तेव्हा आपोआपच नावड, तिरस्कार आणि राग जन्माला येतो. याउलट, स्थितप्रज्ञ अशी कोणतीच ठिगळे लावत नसल्याने या गोष्टींबद्दल त्याच्या मनात राग उत्पन्न होत नाही. असेच, काही चांगले जरी घडले तरी स्थितप्रज्ञ अवास्तव आनंदी होत नाही.

उदाहरणार्थ, काळानुसार आपल्या सगळ्यांचे वय नैसर्गिकपणे वाढत जाते आणि आपले सौंदर्य, तेज आणि उत्साह नष्ट होत जाते. आता या नैसर्गिक बाबींना आपण वाईट किंवा नकोसे ठरवले तर त्यातून आपल्या पदरी दु:खच येईल. एखादी जखम झाली किंवा आजार झाल्यास त्यांना वाईट ठरवण्याने आपण केवळ दु:खीच होतो. त्यामुळे नकारही नको आणि निष्कर्ष काढणे नको.

स्थितप्रज्ञ कोणतीही परिस्थिती ही एखाद्या शल्यविशारदासारखी हाताळतो ज्याला रुग्ण तपासणीतून मिळालेल्या तथ्यांच्या आधारे शस्त्रक्रिया करायची असते. हे एखाद्या सुपरकंडक्टरसारखे आहे जो वीज सहज वाहून नेण्यासाठी सगळे प्रयत्न करतो.

आपण एक तर परिस्थितीला, लोकांना किंवा कामांना चिकटून बसतो किंवा त्यांचा तिरस्कार करतो. चिकटून राहणे हे आसक्ति आहे हे सहज समजू शकते मात्र, तिरस्कार करणे किंवा टाळणे हे देखील एक प्रकारे आसक्ति आहे पण द्वेषाने. जेव्हा श्रीकृष्ण म्हणतो स्थितप्रज्ञ हा कशातही गुंतत नाही, त्याच्या म्हणण्याचा अर्थ असतो की तो ना कशाला चिकटून बसत ना कशाला टाळत.

Comments

Popular posts from this blog

66. समर्पण की संघर्ष

89. स्वत: ला मुक्त करा

69. अभिनेता आणि प्रेक्षकही