98. करणे किंवा न करणे
अर्जुन
म्हणतो, हे कृष्णा, तू कर्मांचा त्याग करण्याचा कौतुक करतो (कर्मसंन्यास) आणि
त्याच वेळी ती कर्मे करण्याचाही सल्ला देतो. यापैकी कोणता मार्ग श्रेष्ठ हे मला
निश्चितपणे सांग (5.1). याआधीही सांख्य आणि कर्म यांपैकी योग्य आणि निश्चित कल्याणकारक मार्ग कोणता
हे निश्चितपणे सांगण्याबद्दल अर्जुनाने श्रीकृष्णाकडे
आग्रह धरला होता. (3.1 आणि 3.2).
श्रीकृष्ण
मात्र कर्माचा त्याग करण्याचा सल्ला देत नाही आणि उलट ते म्हणतात की कर्माचा त्याग
करून कुणीही सिद्धी प्राप्त करू शकत नाही (3.4). प्रत्येक जण त्यांच्या गुणांप्रमाणे
त्याची कर्मे करण्यास बाध्य असतो (3.5). अगदी मानवी शरीराची निगा राखायची असेल तरीही कर्मे करावीच लागतात (3.8). कर्मसंन्यास हा
सांख्य योगाचाच भाग आहे या श्रीकृष्णाच्या उत्तरातून बर्याच गोष्टी स्पष्ट होतात.
वस्तुत:
कर्माच्या दोन बाजू असतात. एक म्हणजे कर्ता आणि दुसरी कर्मफल म्हणजे कृतींचे
फळ. गुण हेच खरे कर्ते आहेत हे समजून
आपल्या कर्तेपणाचा त्याग करणे याला अर्जुन कर्मसंन्यास म्हणतो. कर्मफलाची अपेक्षा
न करता कर्म करणे याला तो कर्माचे सादरीकरण म्हणतो. थोडक्यात, अर्जुन हे
विचारतो आहे की कर्तापण सोडायचे आहे की कर्मफल?
परित्याग
केल्याने आणि कर्म केल्याने अशा दोन्ही गोष्टींनी मोक्षप्राप्ती होते. मात्र,
त्यातही कर्मांचा त्याग करण्यापेक्षा कर्मयोग हा अधिक चांगला आहे (5.2). येथे हे लक्षात
घेण्यासारखे आहे की हे उत्तर अर्जुनाला दिले आहे जो कर्मफलाबद्दल चिंतेत आहे. येथे
ते कर्मफल म्हणजे त्याचे शिक्षक, कुटुंबीय आणि मित्रांचा कुरुक्षेत्रावरील युद्धात
होणारा मृत्यू हे आहे. आपल्यापैकी बहुतेक जण अर्जुनासारखा विचार करीत असल्याने अनेकांना
हे लागू होते.
श्रीकृष्ण स्पष्ट करतात की केवळ
मुलेच, आणि बुद्धिमान नाहीत, सांख्य आणि कर्मयोगाला वेगळे मानतात. जो एकामध्ये स्थापित होतो त्याला
दोन्हीचे फळ मिळते (5.4). थोडक्यात, हे दोन्ही मार्ग भिन्न असू शकतात, परंतु गंतव्यस्थान एकच आहे.

Comments
Post a Comment