22. संतुलन हा परमानंद आहे
गीतेच्या
अगदी सुरुवातीला श्रीकृष्ण म्हणतात की, इंद्रियांचे
बाह्य वस्तूंशी मिलन झाल्यामुळे सुख
आणि दुःख होते (2.14). तो अर्जुनाला त्यांना सहन करणे शिकायला, कारण ते अशाश्वत आहेत.
समकालीन जगात याला ‘हाही काळ जाईल’ असे म्हणतात. जर
ते प्रायोगिक स्तरावर विकसित केले गेले, तर आपण या ध्रुवांच्या पलीकडे जाऊ शकतो आणि त्यांना समानतेने
स्वीकारण्याची क्षमता असू शकते.
आपल्याकडे
पाच इंद्रिये आहेत; दृष्टी, ऐकणे, गंध, चव आणि स्पर्श. ती अनुक्रमे डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा या पाच अवयवांशी
संबंधित आहेत. विविध अवयवांकडून आलेल्या अनुभवांवर प्रक्रिया करण्याचे काम
मेंदूतील विशिष्ट भागाकडे असते.
तथापि, या संवेदी
साधनांना अनेक मर्यादा आहेत. उदाहरणार्थ डोळा, तो प्रकाशाच्या विशिष्ट वारंवारतेवर
प्रक्रिया करू शकतो ज्याला आपण दृश्यमान प्रकाश म्हणतो. दुसरे, तो प्रति सेकंद
15 पेक्षा जास्त प्रतिमांवर प्रक्रिया करू शकत नाही आणि हा चित्रपट तयार करण्यासाठी आधार आहे जा आपल्याला स्क्रीनवर पाहण्यात आनंद होतो. तिसरे, आपल्याला एखादी वस्तू
बघणे शक्य व्हावे यासाठी एका किमान पातळीवरचा प्रकाश आवश्यक असते. इंद्रियांच्या
या मर्यादांमुळे आपल्याला सत (शाश्वत) आणि असत (अशाश्वत) यांच्यात फरक करणे जमत
नाही आणि आपण दोरीला साप समजायला लागतो.
मेंदूतील
या उपकरणांचे संवेदी भाग देखील उपकरणांच्या मर्यादांनी बांधलेले असतात. दुसरे
म्हणजे, बालपणात त्यांना
ज्या प्रकारे वागणूक दिली गेली त्याचा त्यांना त्रास होतो. परिणाम प्रेरित धारणा
आहे ज्यामुळे आपल्याला वास्तविकतेऐवजी जे पहायचे आहे ते आपण पाहतो.
सत्य
पाहण्याची असमर्थता आणि असत्यकडचा ओढा दुःखाला
कारणीभूत ठरतो. श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा तुम्ही सुख आणि दु:खाच्या आघातामध्ये समतोल साधता तेव्हा तुम्ही अमृताला (मोक्षास) पात्र असता (2.15), जी मुक्ती, इथे आणि आता आहे.

Comments
Post a Comment