27. स्वधर्माशी समन्वय
श्रीकृष्ण
स्वधर्माचे स्पष्टीकरण देतात (2.31-2.37) आणि ते अर्जुनला सांगतात की अशी अवांछित
लढाई स्वर्गाचे दार उघडते (2.32) आणि त्यापासून पळून गेल्याने स्वधर्म आणि कीर्ती
नष्ट होईल आणि पाप होईल (2.33). रणांगणावर अर्जुनाला दिलेला हा उपदेश त्याच्या
योग्य संदर्भात पाहण्याची गरज आहे. श्रीकृष्ण खरे तर स्वधर्माशी संदर्भात समन्वय
आणि सुसंवादाबद्दल बोलत आहेत, युद्धाबद्दल
नाही.
श्रीकृष्णाला
अर्जुनाचे विचार, शब्द आणि कृती यात विसंगती आढळते. तो अर्जुनाला सुसंगती आणण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. अर्जुनाच्या बाबतीत, स्वतःच्या
धर्मानुसार युद्ध लढण्यात सुसंगती आहे आणि
युद्धापासून पळून जाण्यात विसंगती आहे.
खरं
तर, समन्वय हा
सृष्टीचा नियम आहे जिथे सर्वात लहान ‘इलेक्ट्रॉन’, ‘प्रोटॉन’ आणि ‘न्यूट्रॉन’ पासून ते मोठ्या
आकाशगंगा, ग्रह आणि तारे
एकसंध असतात. जेव्हा रेडिओ आणि रेडिओ स्टेशनचा ताळमेळ (ट्यून) असतो तेव्हाच आपण आपल्या आवडत्या संगीताचा आनंद घेऊ शकतो. मानवी शरीरापेक्षा समन्वयाचे कोणतेही मोठे
उदाहरण नाही, ज्यामध्ये अनेक अवयव आणि रसायने असतात ज्यांच्या समन्वयात्मक
कार्यामुळे आपण जसे आहोत तसे बनलो आहोत. समन्वय म्हणजे
गोष्टी आणि परिस्थिती जशा आहेत तशा, आपल्या संदर्भ आणि मूल्यव्यवस्यच्या चौकटीत आपल्याला हवेत तशा नव्हे.
आपल्या
लहानपणापासून, आपल्याला शिकविण्यात आले आहे की सत्कर्मांमुळे मृत्युंनंतर आपण
स्वर्गात जातो आणि वाईट कृत्यांमुळे नरकात. श्रीकृष्ण म्हणतात, स्वर्ग आणि नरक या
मृत्यूनंतरच्या गोष्टी नाहीत, तर त्या आता आणि येथेच अस्तित्वात आहे. कुणाच्या
क्षमतेला कशी आणि किती संधी मिळते त्यावर हे अवलंबून आहे.
जेव्हा
आपण इतरांचा स्वधर्म समजून घेतो तेव्हा कुटुंबात, कामाच्या ठिकाणी आणि नातेसंबंधांमध्ये
सुसंवाद असतो जो स्वर्ग आहे आणि त्याचा अभाव नरक आहे. आपल्या इच्छा पूर्ण होतात की
नाही यावर आपल्या आनंद किंवा दुःखचा अनुभव
अवलंबून असतो.
जेव्हा स्वधर्माशी आंतरिक समन्वय साधला जातो तेव्हा तो बाह्य जगाचा विचार न करता
स्वर्गासारखा असतो.

Comments
Post a Comment