48. स्वतःवर समाधानी

 

भगवान श्रीकृष्ण ने 2.11 से 2.53 पर्यंत सांख्ययोग प्रकट केला, जो अर्जुनासाठी पूर्णपणे नवीन होता. अर्जुनाला हे जाणून घ्यायचे होते की समाधी घेतलेल्या स्थितप्रज्ञाची वैशिष्ट्ये कोणती आहेत आणि स्थितप्रज्ञ कसे बोलतो, बसतो आणि चालतो (2.54).

अर्जुनाला  स्पष्टीकरणाद्वारे (2.55), श्रीकृष्ण आपल्या तुलना-शोधक मनाला मदत करण्यासाठी मानक निर्धारित  करतात. या मानकांद्वारे आपण आपल्या आध्यात्मिक प्रवासाची प्रगती मोजतो.

श्रीकृष्ण म्हणतात, "ज्या वेळी मनुष्य मनातील सर्व इच्छांचा पूर्णपणे त्याग करून आत्म्यात तृप्त राहतो, त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात" (2.55). जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःमध्ये समाधानी असते तेव्हा इच्छा आपोआप संपतात. इच्छा संपल्या की त्यांच्या सर्व क्रिया नि:स्वार्थी कृती बनतात.

आपण जे आहोत त्यापेक्षा आपल्या मूलभूत इच्छा वेगळ्या असतात. आपल्याला लवकरच कंटाळा येतो. अर्थशास्त्रात याला “इच्छा पूर्ण झाल्या की प्रेरणाही संपते” असे म्हटले जाते. मूलत: प्रत्येक जण ही बाब दुसर्‍याकरिता एक क्लृप्ती म्हणून वापरतो ज्यामुळे स्थितप्रज्ञतेची अवस्था गाठणे अशक्य होते. उदाहरणार्थ, ग्राहकोपयोगी वस्तू निर्माण करणार्‍या कंपन्या या निरनिराळी उत्पादने, नवी मॉडेल्स नियमितपणे आणत आसतात कारण त्यांना माहिती असते की आपल्याला दरवेळी नवे मॉडेल घेण्याची इच्छा असते.

दुसरीकडे, जर आपण स्वतः समाधानी नसलो किंवा किमान आपण स्वतः समाधानी राहण्यास सक्षम नाही असा विश्वास ठेवला तर कुटुंबासह इतर लोक आपल्या बरोबर आनंदी राहतील अशी अपेक्षा आपण कशी करू शकतो. याचीच दुसरी बाजू म्हणजे, जे स्वतःला संतुष्ट करू शकत नाहीत त्यांच्याकडून आपण आनंद कसा मिळवू शकतो.

इच्छा सोडण्यासाठी प्रत्येक सुखाचा शोध मृगजळाचा पाठलाग करण्यासारखा आहे याची खोल जाणीव असणे आवश्यक आहे. आपल्या आयुष्यातील सर्व अनुभव या मूलभूत सत्याची पुष्टी करतात. इच्छांचा त्याग करणे म्हणजे जाणीवपूर्वक त्यांची तीव्रता कमी करणे, म्हणजेच त्यांचा पाठलाग कमी करणे, आणि असे केल्याने मनुष्याला शांती मिळते.

Comments

Popular posts from this blog

66. समर्पण की संघर्ष

89. स्वत: ला मुक्त करा

69. अभिनेता आणि प्रेक्षकही