87. नित्य समाधानी
एका
भुकेल्या कोल्ह्याने वर लटकलेल्या द्राक्षांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, तो अयशस्वी झाला
आणि द्राक्षे आंबट आहेत असा विचार करू लागला. ही परिचित कथा निराशा, पूर्तता आणि
आनंद यांच्याशी व्यवहार करण्याच्या मुद्द्यावर अनेक कोन देते.
समकालीन
मानसशास्त्र ‘सुखाचे संश्लेषण’ हे मानवी मेंदूच्या कार्यांपैकी एक कार्य मानतात जे आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर
पडण्यास मदत करते. कोल्ह्याने तेच केले आणि द्राक्षे आंबट असल्याचे कारण देऊन स्वतःचे पुढे निघून गेला.
समाधानाच्या
संदर्भात, श्रीकृष्ण 'सुखाच्या
संश्लेषणा'च्या पलीकडे
जाऊन म्हणतात, "ज्या मनुष्याने सर्व कृती आणि त्यांच्या परिणामांची आसक्ती पूर्णपणे
सोडून दिली आहे आणि जगाच्या आधारापासून मुक्त झाला आहे आणि सदैव समाधानी आहे, तो आपले कर्तव्य
चोख बजावत असला तरी प्रत्यक्षात तो काहीच करत नाही” (4.20). ‘स्वतःवर समाधानी’ ही गीतेच्या
मुख्य शिकवणींपैकी एक आहे आणि अनेक प्रसंगी, श्रीकृष्ण अर्जुनाला आत्मवान किंवा
आत्मतृप्त होण्याचा सल्ला देतात, जे मूलत: स्वतःवर समाधानी आहे. आत्मवान व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत
समाधानाचा सुगंध सर्वत्र पसरवत असतो.
कर्म
आणि अकर्माबद्दल सांगताना श्रीकृष्ण म्हणतात की ज्ञानी मनुष्यदेखील हे
गुंतागुंतीचे मुद्दे समजून घेताना गोंधळून जातात. या श्लोकामध्ये ते म्हणतात की
कायम समाधानी मनुष्य वेगवेगळ्या कृतींमध्ये समाविष्ट असला तरी तो काहीच करत नाही
आणि त्यातूनच कर्मामधील अकर्माचे अस्तित्व स्पष्ट होते.
आपण आज आहोत त्यापेक्षा काहीतरी
वेगळे व्हावे ही आपली मूलभूत इच्छा आहे. गंमत म्हणजे त्या इच्छेनुसार काहीतरी
बनल्यानंतर माणसाला काहीतरी वेगळे बनण्याची इच्छा असते. आनंद आणि संपत्तीच्या
शोधातही, हे कधीही न संपणारे चक्र आहे जिथे ध्येये बदलत
राहतात.
ही
सगळी धावाधाव म्हणजे मृगजळाच्या मागे धावण्यासारखे आहे आणि ही धावाधाव आपल्याला थकविणारी
असते हे जेव्हा कळते तेव्हा आपण कर्मफलाची वासना हळूहळू गळायला लागते आणि
स्वत:बद्दल कायमस्वरुपी समाधानी होतो. एखादे लहान मूल जसे कोणत्याही कारणास्तव
हसते आणि अकारणच आनंदी असते, तसे आपलेही व्हायला लागते.

Comments
Post a Comment