95. पापाच्या महासागरासाठी शहाणपणाचा तराफा

 

आपण पाप करतो आहोत या भावनेतून अर्जुनाच्या मनात नैराश्य निर्माण झाले होते. त्याला असे वाटत असते की आपले शिक्षक, नातेवाईकआणि मित्रांना मारणे (1.36) हे पाप आहे आणि असे कृत्य त्याने टाळले पाहिजे (1.38). सत्तेच्या लोभापायी तो आणि त्याचे बंधू आपल्याच भावांना मारण्याची तयारी या भावनेने तो अधिक व्यथित झाला आहे (1.45). अर्जुनासमोर योग्य दृष्टिकोन मांडण्यासाठी श्रीकृष्ण त्याच्याशी अनेक वेळा पापांसंदर्भात बोलतो.

श्रीकृष्ण म्हणतात, जरी तुम्ही सगळं पापीमध्ये सर्वात अधिक पापी असाल तरी ज्ञानाच्या नावेत तुम्ही पापाचा सागर सुरक्षितपणे पार कराल (4.36). जशी जळती ज्वाला सरपण खाऊन टाकते, त्याचप्रमाणे ज्ञानाची अग्नी सर्व कर्मे खाऊन टाकते (4.37).

श्रीकृष्णासाठी पाप हा असा अंधार आहे, जो शहाणपणाच्या आणि जाणिवेच्या प्रकाशाने दूर होतो. अंधार बराच काळ राहू शकतो किंवा तो घनदाटही असू शकतो मात्र प्रकाशासमोर तो टिकाव धरू शकत नाही.

मात्र सर्वसामान्यपणे सांगितल्या जाणार्‍या धार्मिक बाबींपेक्षा हे वेगळे आहे. पाप म्हणविल्या कृती, विचार आणि भावनांचा संबंध सामान्यत: दु:खाशी जोडला असतो. पाप केल्यास विविध प्रकारे प्रायश्चित्त घेण्याबाबत सर्वच धर्मांमध्ये सांगितले आहे. या पापांपासून मुक्ती मिळविणे आणि आयुष्यात सुख प्राप्त करणे यासाठीही विविध कर्मकांड सांगितले गेले आहेत. पापे साधे आहेत की खोल आहेत यावर अवलंबून विधीचे प्रमाण आणि गुणवत्ता बदलते. दीर्घकाळ पाप केले असल्यास, त्याचे प्रायश्चित्त आणि खंतही मोठी होते.

मात्र कृष्णाच्या दृष्टीने पापाची लांबी आणि खोली याला काहीही अर्थ नाही. आपण तेसमजून घेऊ शकलो पाहिजे ज्यामुळे स्वत:मध्ये आपल्याला सर्व प्राणिमात्र दिसेल आणि भगवंतही (4.35).

धर्म पाप करण्याच्या आपल्या अपराधावर भरभराट करतात, तर अध्यात्म कृतज्ञता आणि जागरूकता याबद्दल आहे की पाप आणि पुण्य हे एकतेचा भाग आहेत.


Comments

Popular posts from this blog

66. समर्पण की संघर्ष

89. स्वत: ला मुक्त करा

69. अभिनेता आणि प्रेक्षकही