54. इंद्रियांची स्वयंचलितता


 श्रीकृष्ण अर्जुनाला सावध करतात, "अशांत इंद्रिये, प्रयत्न करत असताना, बुद्धीमान माणसाचे मनही जबरदस्तीने काढून घेतात" (2.60). हा श्लोक उत्साहाने भरलेल्या इंद्रियांच्या स्वयंचलितपणाबद्दल आहे.  

धुम्रपान करणार्‍यांचे उदाहरण याबाबत अत्यंत बोलके आहे. धूम्रपान करणार्‍याला त्याचे तोटे माहिती असतात, पण ते सोडणे त्याला खूप कठीण जाते आणि जेव्हा याची जाणिव त्याला किंवा तिला होते, तोपर्यंत सिगारेट पेटली असते. रस्त्यावरील भांडणे किंवा गुन्ह्यांमध्ये अडकलेला प्रत्येक जण हे पुष्टी करतो की ते त्या वेळच्या भावनेच्या भरात घडले, ठरवून केले नाही. कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबात कटु बोलणार्‍याचेही तसेच असते आणि नंतर त्याला खंत वाटत राहते कारण त्याला ते मुद्दाम करायचे नसते. या उदाहरणांवरून स्पष्ट होते की इंद्रिये आपल्यावर वर्चस्व गाजवतात आणि कर्मबंधनांत आपल्याला बांधून टाकतात.

आपल्या सुरुवातीच्या काळात, मेंदूतील न वापरलेले न्यूरॉन्स चालण्यासारख्या स्वयंचलित क्रियाकलापांची काळजी घेण्यासाठी हार्ड वायरिंग नावाचे कनेक्शन बनवतात कारण यामुळे मेंदूची बरीच ऊर्जा वाचते. आयुष्याच्या उत्तरार्धात कौशल्ये आणि सवयी आत्मसात करण्यासाठी हेच खरे आहे.

प्रयत्न आणि उर्जेने तयार केलेली अत्यावश्यक हार्ड वायरिंग इतकी शक्तिशाली बनते की त्यावर आधारित सवयी मोडणे अत्यंत कठीण आहे. न्यूरोसायन्स सांगते की हार्ड वायरिंग तोडणे अशक्य आहे परंतु नवीन हार्ड वायरिंग तयार करणे सोपे आहे.

या प्रक्रियेचा संदर्भ देताना श्रीकृष्ण म्हणतात की इंद्रिये इतकी शक्तिशाली आहेत की ती एखाद्या बुद्धिमान व्यक्तीच्या मनालाही हरवू शकतात.

श्रीकृष्ण म्हणतात की सर्वशक्तिमान देवासमोर शरण जावे जेणेकरुन इंद्रियांच्या स्वयंचलिततेवर मात करता येईल (2.61). इंद्रियांशी संघर्ष न करता जाणीवपूर्वक सर्वशक्तिमान देवाला शरण जावे लागते, जे इंद्रियांच्या स्वयंचलिततेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ऊर्जा प्रदान करते.

Comments

Popular posts from this blog

66. समर्पण की संघर्ष

89. स्वत: ला मुक्त करा

69. अभिनेता आणि प्रेक्षकही